शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

लेखी परीक्षेनंतर अंतर्गत गुणांकन; शाळेतच होणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत ...

१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लेखी परीक्षांसाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो आहे. त्याच शाळेत त्याची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वर्गखोल्यांची कमतरता जाणवेल त्यांची व्यवस्था लगतच्या परीक्षा उपकेंद्रात करण्यात येणार आहे.

लेखी परीक्षेच्या वेळी कोरोनाची लक्षणे विद्यार्थ्यांमध्ये आढळल्यास त्यांची जून महिन्यात ठराविक ठिकाणी विशेष परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. यासाठी तालुकास्तरावर मोजकी परीक्षा केंद्र असतील. याबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर होणार आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने बोर्डाने लेखी परीक्षेचा कालावधीत वाढ केली आहे. ८० गुणांच्या पेपरसाठी तीन तासाऐवजी साडेतीन तासांचा वेळ असेल. ४० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढविली आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक पेपरसाठी २० मिनिटे वेळ अधिक असेल.

परीक्षेच्या तारखात बदल

१२ ते २८ एप्रिल दरम्यान १० वी तर ५ ते २२ एप्रिल या कालावधीत १२ वीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, यावर्षी १० वीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार नाहीत तर लेखी परीक्षेनंतर १० वीच्या विद्यार्थ्यांना २१ मे ते १० जून या कालावधीत लेखन कार्य सादर करावे लागणार आहेत.

१२ वीच्या विद्यार्थ्यांची २२ मे, १० जून या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होईल. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यंदा कमी झाल्याने पाच ते सहा प्रात्यक्षिकांवर परीक्षा घेतली जाईल. याबाबत लवकरच माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्डाकडून दिली जाणार आहे.