शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लेखी परीक्षेनंतर अंतर्गत गुणांकन; शाळेतच होणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत ...

१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लेखी परीक्षांसाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो आहे. त्याच शाळेत त्याची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वर्गखोल्यांची कमतरता जाणवेल त्यांची व्यवस्था लगतच्या परीक्षा उपकेंद्रात करण्यात येणार आहे.

लेखी परीक्षेच्या वेळी कोरोनाची लक्षणे विद्यार्थ्यांमध्ये आढळल्यास त्यांची जून महिन्यात ठराविक ठिकाणी विशेष परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. यासाठी तालुकास्तरावर मोजकी परीक्षा केंद्र असतील. याबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर होणार आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने बोर्डाने लेखी परीक्षेचा कालावधीत वाढ केली आहे. ८० गुणांच्या पेपरसाठी तीन तासाऐवजी साडेतीन तासांचा वेळ असेल. ४० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढविली आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक पेपरसाठी २० मिनिटे वेळ अधिक असेल.

परीक्षेच्या तारखात बदल

१२ ते २८ एप्रिल दरम्यान १० वी तर ५ ते २२ एप्रिल या कालावधीत १२ वीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, यावर्षी १० वीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार नाहीत तर लेखी परीक्षेनंतर १० वीच्या विद्यार्थ्यांना २१ मे ते १० जून या कालावधीत लेखन कार्य सादर करावे लागणार आहेत.

१२ वीच्या विद्यार्थ्यांची २२ मे, १० जून या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होईल. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यंदा कमी झाल्याने पाच ते सहा प्रात्यक्षिकांवर परीक्षा घेतली जाईल. याबाबत लवकरच माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्डाकडून दिली जाणार आहे.