शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

बाहेरील व्यक्तींना मतदारसंघ सोडण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:48 IST

अन्यथा कारवाई होणार : कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

नंदुरबार : लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरीता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यासाठी आलेले आणि मतदारसंघाचे मतदान नसलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हिंतचिंतकांनी मतदारसंघाचे क्षेत्र सोडून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात परत येवू नये, आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा जिल्हाधिकारी डॉ.बालाजी मंजुळे यांनी दिला आहे.भारत निवडणूक आयोगाने १० मार्च २०१९ पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. त्याच दिवसापासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू झालेली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरीता भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ नुसार ज्या मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे, अशा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास अगोदर किंवा प्रचार करण्याची मुदत संपल्यानंतर ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील, भागामधून /क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यास आलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हितचिंतक इत्यादींना व जे या मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदार नाहीत, अशा सर्व व्यक्तींना या मतदारसंघाचे क्षेत्र सोडून जाणे आवश्यक आहे. तसेच २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यत क्षेत्रात परत येण्याची अनुमती नाही. अशा व्यक्ती या मतदारसंघाच्या क्षेत्रात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.पोलिस विभागाने धर्मशाळा, गेस्ट हाऊस, लॉज आदींची यादी बनवून तसेच भाड्याने घेतलेली घरे इत्यादी सर्व स्थळांची पाहणी यापूर्वीच सुरू केली आहे. तसेच मतदान क्षेत्रातील सीमांवर चेकपोस्ट, तपासणी नाका उभारून व मतदान क्षेत्राच्या बाहेरुन येणाºया वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. अशा सर्व व्यक्तींचे अथवा समूहातील व्यक्तींची ओळख तपासण्यात येत आहे. ते या मतदान क्षेत्रातील आहेत किंवा नाही याची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही मंजुळे यांनी निर्देशित केले आहे.