शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरील व्यक्तींना मतदारसंघ सोडण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:48 IST

अन्यथा कारवाई होणार : कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

नंदुरबार : लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरीता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यासाठी आलेले आणि मतदारसंघाचे मतदान नसलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हिंतचिंतकांनी मतदारसंघाचे क्षेत्र सोडून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात परत येवू नये, आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा जिल्हाधिकारी डॉ.बालाजी मंजुळे यांनी दिला आहे.भारत निवडणूक आयोगाने १० मार्च २०१९ पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. त्याच दिवसापासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू झालेली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरीता भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ नुसार ज्या मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे, अशा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास अगोदर किंवा प्रचार करण्याची मुदत संपल्यानंतर ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील, भागामधून /क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यास आलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हितचिंतक इत्यादींना व जे या मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदार नाहीत, अशा सर्व व्यक्तींना या मतदारसंघाचे क्षेत्र सोडून जाणे आवश्यक आहे. तसेच २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यत क्षेत्रात परत येण्याची अनुमती नाही. अशा व्यक्ती या मतदारसंघाच्या क्षेत्रात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.पोलिस विभागाने धर्मशाळा, गेस्ट हाऊस, लॉज आदींची यादी बनवून तसेच भाड्याने घेतलेली घरे इत्यादी सर्व स्थळांची पाहणी यापूर्वीच सुरू केली आहे. तसेच मतदान क्षेत्रातील सीमांवर चेकपोस्ट, तपासणी नाका उभारून व मतदान क्षेत्राच्या बाहेरुन येणाºया वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. अशा सर्व व्यक्तींचे अथवा समूहातील व्यक्तींची ओळख तपासण्यात येत आहे. ते या मतदान क्षेत्रातील आहेत किंवा नाही याची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही मंजुळे यांनी निर्देशित केले आहे.