शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

बाहेरील व्यक्तींना मतदारसंघ सोडण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:48 IST

अन्यथा कारवाई होणार : कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

नंदुरबार : लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरीता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यासाठी आलेले आणि मतदारसंघाचे मतदान नसलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हिंतचिंतकांनी मतदारसंघाचे क्षेत्र सोडून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात परत येवू नये, आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा जिल्हाधिकारी डॉ.बालाजी मंजुळे यांनी दिला आहे.भारत निवडणूक आयोगाने १० मार्च २०१९ पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. त्याच दिवसापासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू झालेली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरीता भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ नुसार ज्या मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे, अशा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास अगोदर किंवा प्रचार करण्याची मुदत संपल्यानंतर ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, मतदारसंघ क्षेत्राच्या बाहेरील, भागामधून /क्षेत्रामधून उमेदवारांना मदत करण्यास आलेले कार्यकर्ते, प्रतिनिधी, हितचिंतक इत्यादींना व जे या मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदार नाहीत, अशा सर्व व्यक्तींना या मतदारसंघाचे क्षेत्र सोडून जाणे आवश्यक आहे. तसेच २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यत क्षेत्रात परत येण्याची अनुमती नाही. अशा व्यक्ती या मतदारसंघाच्या क्षेत्रात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.पोलिस विभागाने धर्मशाळा, गेस्ट हाऊस, लॉज आदींची यादी बनवून तसेच भाड्याने घेतलेली घरे इत्यादी सर्व स्थळांची पाहणी यापूर्वीच सुरू केली आहे. तसेच मतदान क्षेत्रातील सीमांवर चेकपोस्ट, तपासणी नाका उभारून व मतदान क्षेत्राच्या बाहेरुन येणाºया वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. अशा सर्व व्यक्तींचे अथवा समूहातील व्यक्तींची ओळख तपासण्यात येत आहे. ते या मतदान क्षेत्रातील आहेत किंवा नाही याची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही मंजुळे यांनी निर्देशित केले आहे.