शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खरिपात चढणार महागाईचा पारा, खतांना लागणार दरवाढीचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

जिल्ह्यात प्रामुख्याने २ लाख ९५ हजार हेक्टरवर सरासरी खरीप पेरणी करण्यात येते. यासाठी ९६ हजार मेट्रीक टन खते आणि ...

जिल्ह्यात प्रामुख्याने २ लाख ९५ हजार हेक्टरवर सरासरी खरीप पेरणी करण्यात येते. यासाठी ९६ हजार मेट्रीक टन खते आणि मिश्र खते मागवण्यात येतात. यातील युरियासह इतर रासायनिक मिश्र खतांची गेल्या काही वर्षात टंचाई जाणवत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा खतांच्या वितरणाकडे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान गेल्या वर्षापासून खतांचे दर हे १० ते २० टक्के वाढल्याचे समोर आले होते. यात यंदा पुन्हा दरांमध्ये वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. यातून शेतकरी नियोजनात व्यस्त झाले आहेत.

इंधन दरवाढ परिणामकारक

जिल्ह्यात मागवण्यात येणारे खत हे प्रामुख्याने रेल्वे रॅकने येते. परंतु हा रॅक केवळ दोंडाईचा येथे येतो. यामुळे दोंडाईचा येथून रस्ते वाहतुकीने खते आणली जात होती. वाहतुकीसाठी होणारा खर्च वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच भागात खतांचे दर वाढणार असल्याची माहिती आहे.

मशागतही महागणार

अद्याप खरीप हंगामाचे नियोजन सुरु आहे. प्रत्यक्षात येत्या मे महिन्यापासून शेती मशागतीच्या कामांना शेतकरी सुरुवात करतील. तत्पूर्वी खर्च वाढल्याचे समोर आल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. बहुतांश शेतकरी आता ट्रॅक्टरद्वारे मशागत करत असल्याने वाढीव खर्चाचा बोजा पडणार आहे. डिझेलचे दर वाढल्याने शेत मशागत करणेही महागच पडणार आहे. यात आता मिश्र खतांचे दर वाढत असल्याने समस्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्याप खतांचा साठा आलेला नसला तरी येत्या काळात साठा आल्यावर दरवाढ नक्की असल्याचा दावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५२८ खते व बियाणे विक्रीची दुकाने असून त्यांच्याकडे वेळोवेळी कृषी विभागाचे पथक तपासणी करुन माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

खतांचे दर आतापासूनच वाढत असल्याने चिंता आहे. शासनाने खत दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तरी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. येत्या हंगामात महागाई शेतकऱ्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

-कृष्णा मोतीराम मराठे,

शेतकरी, रांझणी ता. तळोदा.

आधीच शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाला आहे. त्यात आता खतांच्या दरवाढीचे संकट आहे. यातून छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होणार आहे. कर्जाचा बोजाही वाढू शकतो. खत दरवाढीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

-गणपत लेहऱ्या पावरा,

शेतकरी,रोझवा पुर्नवसन ता. तळोदा.

आधीच आपल्याकडे खतांचा नियमित पुरवठा होत नाही. शेतकरी अडचणीत येतात. यात आता खतांची दरवाढ होणार असेल तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे. साठेबाजांमुळे खतांचा बाजार वर्षभर तेजीत ठेवला जातो.

-महेंद्र दामोदर भारती,

शेतकरी, रांझणी ता. तळोदा.