शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

खरिपात चढणार महागाईचा पारा, खतांना लागणार दरवाढीचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

जिल्ह्यात प्रामुख्याने २ लाख ९५ हजार हेक्टरवर सरासरी खरीप पेरणी करण्यात येते. यासाठी ९६ हजार मेट्रीक टन खते आणि ...

जिल्ह्यात प्रामुख्याने २ लाख ९५ हजार हेक्टरवर सरासरी खरीप पेरणी करण्यात येते. यासाठी ९६ हजार मेट्रीक टन खते आणि मिश्र खते मागवण्यात येतात. यातील युरियासह इतर रासायनिक मिश्र खतांची गेल्या काही वर्षात टंचाई जाणवत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा खतांच्या वितरणाकडे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान गेल्या वर्षापासून खतांचे दर हे १० ते २० टक्के वाढल्याचे समोर आले होते. यात यंदा पुन्हा दरांमध्ये वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. यातून शेतकरी नियोजनात व्यस्त झाले आहेत.

इंधन दरवाढ परिणामकारक

जिल्ह्यात मागवण्यात येणारे खत हे प्रामुख्याने रेल्वे रॅकने येते. परंतु हा रॅक केवळ दोंडाईचा येथे येतो. यामुळे दोंडाईचा येथून रस्ते वाहतुकीने खते आणली जात होती. वाहतुकीसाठी होणारा खर्च वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच भागात खतांचे दर वाढणार असल्याची माहिती आहे.

मशागतही महागणार

अद्याप खरीप हंगामाचे नियोजन सुरु आहे. प्रत्यक्षात येत्या मे महिन्यापासून शेती मशागतीच्या कामांना शेतकरी सुरुवात करतील. तत्पूर्वी खर्च वाढल्याचे समोर आल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. बहुतांश शेतकरी आता ट्रॅक्टरद्वारे मशागत करत असल्याने वाढीव खर्चाचा बोजा पडणार आहे. डिझेलचे दर वाढल्याने शेत मशागत करणेही महागच पडणार आहे. यात आता मिश्र खतांचे दर वाढत असल्याने समस्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्याप खतांचा साठा आलेला नसला तरी येत्या काळात साठा आल्यावर दरवाढ नक्की असल्याचा दावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५२८ खते व बियाणे विक्रीची दुकाने असून त्यांच्याकडे वेळोवेळी कृषी विभागाचे पथक तपासणी करुन माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

खतांचे दर आतापासूनच वाढत असल्याने चिंता आहे. शासनाने खत दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तरी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. येत्या हंगामात महागाई शेतकऱ्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

-कृष्णा मोतीराम मराठे,

शेतकरी, रांझणी ता. तळोदा.

आधीच शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाला आहे. त्यात आता खतांच्या दरवाढीचे संकट आहे. यातून छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होणार आहे. कर्जाचा बोजाही वाढू शकतो. खत दरवाढीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

-गणपत लेहऱ्या पावरा,

शेतकरी,रोझवा पुर्नवसन ता. तळोदा.

आधीच आपल्याकडे खतांचा नियमित पुरवठा होत नाही. शेतकरी अडचणीत येतात. यात आता खतांची दरवाढ होणार असेल तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे. साठेबाजांमुळे खतांचा बाजार वर्षभर तेजीत ठेवला जातो.

-महेंद्र दामोदर भारती,

शेतकरी, रांझणी ता. तळोदा.