शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

जिल्ह्यातील उद्योगांचे उत्पादन झाले अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जून महिन्यापासून जिल्ह्यात लघु आणि मोठ्या उद्योगांची गाडी वेगात दीड हजार लघु आणि मोठे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जून महिन्यापासून जिल्ह्यात लघु आणि मोठ्या उद्योगांची गाडी वेगात दीड हजार लघु आणि मोठे उद्योग पूर्ण क्षमतेने उत्पादन करु लागल्याने मजूरांचा रोजगार पूर्ववत होण्यास मदत मिळत आहे़लॉकडाऊनमुळे लघु आणि मोठ्या उद्योग मार्च ते मे या काळात बंद होते़ जून महिन्यात काही प्रमाणात ४० टक्के कामगारांसह उद्योग सुरू करण्याची परवानगी होती़ परंतु वाहतूकीवर निर्बंध असल्याने अडचणी कायम होत्या़ मात्र गेल्या अडीच महिन्यात उद्योगांना सावरणाऱ्या सुविधा पूर्ववत झाल्याने परंतू नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊनच्या चारच्या शेवटच्या टप्प्यात सुरु झालेल्या बाजारपेठा या उद्योगांना संजीवनी देणाºया ठरल्या आहेत़ यामुळे हळहळू हे उद्योग निर्मिती प्रक्रियेत वेग पकडत आहेत़ परिणामी त्यांच्याकडे काम करणारे मजूर परतू लागल्याने त्यांच्या हातून गेलेले काम पुन्हा परत मिळाले आहे़ जिल्ह्यात मिरची प्रक्रिया हा प्रमुख उद्योग असून पॅकिंगसह त्याची वाहतूक करण्यासही सुरूवात झाल्याने उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते एप्रिल महिन्यात गावी परत गेलेले बरचसे मजूर परत आल्याने उद्योगांनाही चालना मिळत आहे़

४जिल्ह्यात ९ मोठे आणि १ हजार ४४६ लघु उद्योग आहेत़ मोठ्या उद्योगांमध्ये प्रामुख्याने आॅईल मिलचा समावेश या मिल गेल्या अडीच महिन्यांपासून वेगात सुरू असल्याचे दिसून आले़ मिलमध्ये सोयाबीनची आवक होत असल्याने ते काढणीची प्रक्रिया वेगात सुरू आहे़४सोबत जिल्ह्यात मिरची प्रक्रिया, मसाले, इंजिनियअरींग, कृषी पूरक उद्योग, दुग्धत्पोदन हे उद्योगही पूर्ववत सुरू झाले आहेत़ लॉकडाऊन सुरू झत्तल्यानंतर नवापुरातील वस्त्रोद्योग, नंदुरबारातील मसाले व मिरची उद्योग पूर्णपणे बंद पडले होते़ उत्पादन तयार करण्यासाठी कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी साधने नसल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते़परंतु तूर्तास कच्चा माल येऊ लागला असून तयार मालाची वाहतूक सुरू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी परराज्यातून येणारा कच्च्या मालाची वाहतूक करण्यास संमती दिल्याने उद्योगांना गती मिळण्यास मदत मिळाली आहे़ दरम्यान जिल्ह्यातील कारखानदारांनी मजूरांना कारखान्यापर्यंत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थेसह इतर सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याने त्यांच्याही अडचणी दूर झाल्या आहेत़

जिल्ह्यात मिरची प्रक्रिया उद्योगानंतर सर्वाधिक उलाढाल ही कोल्डस्टोरजच्या माध्यमातूनही होते़ धान्य, भाजीपाला, फळे, दूध यासह विविध नाशवंत पदार्थांना सामावून घेणाऱ्या कोल्डस्टोरेजमध्ये नियमित कामांना जाणारे हमाल आणि इतर कामगार यांना रोजगार मिळत आहे़ शहादा आणि नंदुरबार येथील १० कोल्डस्टोरेज अडीच महिन्यांपासून व्यवस्थित सुरू असून त्यांच्या व्यवसायात वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़सोबत परप्रांतीय कामगारांच्या भरवशावर चालणारे इंजिअिरींग, बांधकामासाठी लागणाºया फरशीची कटाई, लाकूड कटाई आणि फर्निचर तयार करण्याचे उद्योगही सुरू झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे़

व्यापार उद्योग सुरळीत सुरु झाला आहे़ वाहतूकीला काही अंशी अडचणी येत आहेत़ परंतु त्या सोडवण्यावर उद्योजक भर देत आहेत़ पावसाळा असल्याने व्यवसाय नेहमीप्रमाणे संथ आहे़ परंतु येत्या महिन्यात मिरची उद्योग पुन्हा वेगात सुरू होईल़ स्थानिक मजूर येऊ लागले आहेत़-शाम बांगड,मिरची प्रक्रिया उद्योजक, नंदुरबाऱ