शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अपक्षांच्या मतांमुळे प्रमुख उमेदवारांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 21:26 IST

नंदुरबार : मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जेमतेम राहत असली तरी अनेक वेळा तेच अपक्ष मुख्य लढत असलेल्या उमेदवारांना डोईजड ...

नंदुरबार : मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जेमतेम राहत असली तरी अनेक वेळा तेच अपक्ष मुख्य लढत असलेल्या उमेदवारांना डोईजड ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन निवडणुकांचा विचार करता २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रमुख दोन उमेदवारांमधील विजयाचे अंतर ४०,८४३ मतांचे होते तर केवळ दोनच अपक्ष उमेदवारांनी यापेक्षा जास्त अर्थात ४१ हजार ३ मते घेतली होती.प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात असतात. कधी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून काही पदरी पाडून घेणे तर कधी दुर्लक्षीत केले गेल्यामुळे संबधीतांना आपली ताकद दाखवून देणे हा त्यामागील उद्देश असतो. काही वेळा समाज, संघटना किंवा पक्षातील अंतर्गत वाद देखील अपक्ष उमेदवारास उभे करण्यास कारणीभूत ठरतात.नंदुरबार लोकसभा मतदार संघातील गेल्या दोन वेळच्या लढतींचे चित्र पहाता अपक्षांमुळे निवडून येणारा उमेदवार पडल्याचे चित्र दिसून येते.२००९ मधील निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि भाजप उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगली होती. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार समाजवादी पार्टीच्या उमेदवारापेक्षा केवळ ४० हजार ८४३ मताधिक्यांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत केवळ दोनच अपक्ष उमेदवार असतांना दोघांनी विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा अधीक अर्थात ४१ हजार ३ मते मिळविली होती. त्यावेळी समाज फॅक्टर अपक्ष उमेदवाराच्या कामी आला होता. परिणामी अपक्षांनी घेतलेली मते पराभूत उमेदवाराचे नुकसान करणारी ठरली होती.२०१४च्या निवडणुकीत एकुण तीन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तिघांनी मिळून १९ हजार ५७६ मते मिळविली होती. परंतु या निवडणुकीत अपक्षांची लाभ-हाणी फारसी जाणवली नाही. कारण मोदी लाटेत विजयी उमेदवाराचे मताधिक्य लाखावर अर्थात एक लाख ६ हजार ४८६ इतके होते.या निवडणुकीत तब्बल सात उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.