शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाचीही भीती झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, ...

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, २०१९ या वर्षात ३ हजार २५९, तर २०२० या वर्षात २ हजार ९६ जणांना क्षयरोग असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या चालू वर्षात विभागाने केलेल्या चाचण्यांनुसार ४६० जणांना क्षयरोग असल्याची माहिती दिली गेली होती. २०१७ पासून रुग्णांना वेळेवर दिल्या जाणाऱ्या औषधी आणि योग्य उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अभिजित गोल्हार यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, कोरोना हा आजार श्वसनाचा आजार आहे. त्याचा विषाणू हा खोकलल्यास किंवा शिंकल्यास पसरून त्याचा संसर्ग होतो. क्षयरोग किंवा टीबी अर्थात ट्यूबरक्यूलोसिस हा आजार ही कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर पूर्वीपासून केला जातो. कोरोनामुळे नागरिकांमध्ये मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाच्या संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे. सोबत लाॅकडाऊनमुळे गर्दीही कमी असल्याने ही संख्या आणखी आटोक्यात आली आहे.

एकीकडे मास्कमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी झाला असताना क्षयरोगींचा मृत्यूदरही कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२०-२०२१ या वर्षात क्षयरोगामुळे ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मृत्यूचा हा दर पाच टक्के असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. क्षयरोगाची लागण झालेल्या १०० पैकी पाच रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती, परंतु गेल्या एक वर्षात ही टक्केवारी एक टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे.