शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाचीही भीती झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, ...

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, २०१९ या वर्षात ३ हजार २५९, तर २०२० या वर्षात २ हजार ९६ जणांना क्षयरोग असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या चालू वर्षात विभागाने केलेल्या चाचण्यांनुसार ४६० जणांना क्षयरोग असल्याची माहिती दिली गेली होती. २०१७ पासून रुग्णांना वेळेवर दिल्या जाणाऱ्या औषधी आणि योग्य उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अभिजित गोल्हार यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, कोरोना हा आजार श्वसनाचा आजार आहे. त्याचा विषाणू हा खोकलल्यास किंवा शिंकल्यास पसरून त्याचा संसर्ग होतो. क्षयरोग किंवा टीबी अर्थात ट्यूबरक्यूलोसिस हा आजार ही कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर पूर्वीपासून केला जातो. कोरोनामुळे नागरिकांमध्ये मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाच्या संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे. सोबत लाॅकडाऊनमुळे गर्दीही कमी असल्याने ही संख्या आणखी आटोक्यात आली आहे.

एकीकडे मास्कमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी झाला असताना क्षयरोगींचा मृत्यूदरही कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२०-२०२१ या वर्षात क्षयरोगामुळे ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मृत्यूचा हा दर पाच टक्के असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. क्षयरोगाची लागण झालेल्या १०० पैकी पाच रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती, परंतु गेल्या एक वर्षात ही टक्केवारी एक टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे.