शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाचीही भीती झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, ...

जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, २०१९ या वर्षात ३ हजार २५९, तर २०२० या वर्षात २ हजार ९६ जणांना क्षयरोग असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या चालू वर्षात विभागाने केलेल्या चाचण्यांनुसार ४६० जणांना क्षयरोग असल्याची माहिती दिली गेली होती. २०१७ पासून रुग्णांना वेळेवर दिल्या जाणाऱ्या औषधी आणि योग्य उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अभिजित गोल्हार यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, कोरोना हा आजार श्वसनाचा आजार आहे. त्याचा विषाणू हा खोकलल्यास किंवा शिंकल्यास पसरून त्याचा संसर्ग होतो. क्षयरोग किंवा टीबी अर्थात ट्यूबरक्यूलोसिस हा आजार ही कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर पूर्वीपासून केला जातो. कोरोनामुळे नागरिकांमध्ये मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाच्या संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे. सोबत लाॅकडाऊनमुळे गर्दीही कमी असल्याने ही संख्या आणखी आटोक्यात आली आहे.

एकीकडे मास्कमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी झाला असताना क्षयरोगींचा मृत्यूदरही कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२०-२०२१ या वर्षात क्षयरोगामुळे ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मृत्यूचा हा दर पाच टक्के असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. क्षयरोगाची लागण झालेल्या १०० पैकी पाच रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती, परंतु गेल्या एक वर्षात ही टक्केवारी एक टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे.