शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव अनुदान केवळ 80 वर्षापुढील वृद्धांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : समाजातील दारिद्रय़ रेषेखालील निराधार वृद्ध व अपंगांच्या योजनांसाठी शासनाने अनुदान वाढविल्याचा दावा केला असला ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : समाजातील दारिद्रय़ रेषेखालील निराधार वृद्ध व अपंगांच्या योजनांसाठी शासनाने अनुदान वाढविल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षा वृद्ध व विधवांच्या अनुदानातच वाढ केल्याचे शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट झाले आहे. या अनुदानाचा वाढीव लाभ ही 80 वर्षावरील लाभाथ्र्यानाच देण्याचा आदेश संबंधीत यंत्रणांनी दिले आहे. अनुदानाच्या लाभाबाबत शासनाचा दुजाभावाच्या धोरणाविषयी इतर लाभाथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरसकट सर्वच लाभार्थ्ीना या वाढीव अनुदानाचा लाभ देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.समाजातील दारिद्रय़ रेषेखालील निराधार, वृद्ध, अपंग व विधवा अशा लाभाथ्र्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संजय गांधी, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धपकाळ, विधवा, अपंग, श्रावणबाळ अशा वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. याशिवाय कुष्ठरोगी, परितकत्या, हत्तीरोग तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरींच्या कुटुंबास योजनेचा लाभ दिला जात असतो. केंद्रशासन व राज्यशासन वेगवेगळे अनुदान देत असते. साधारण 600 रुपये दोन्ही शासनाच्या अनुदानातून संबंधित लाभाथ्र्याना दरमहा मिळत असते. यात केंद्र शासनाचे 200 रुपये तर राज्य शासनाचे 400 अशी अनुदानाची विभागानी आहे. वाढत्या महागाईमुळे हे अनुदान अतिशय तुटपूंजे असल्यामुळे लाभाथ्र्याचा उदर निर्वाहदेखील भागत नसल्यामुळे शासनाने या अनुदानात भरीव वाढ करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती. मात्र याकडे सातत्याने नकारात्मक दृष्टीकोणातून पाहिले जात होते.गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी या अनुदानात वाढ करण्याचा शासनाने विचार केला होता. परंतु त्यात लोकसभेच्या आचार संहितेचा अडथळा आला. त्यानंतर पुन्हा लोकप्रतिनिधींनी अनुदान वाढविण्याबाबत शासनाकडे मागणी केली. या पाश्र्वभूमिवर शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात साधारण 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शासनाच्या या योजनांवरील तरतुदीमुळे साहजिकच लाभाथ्र्याचाही वाढीव अनुदानाबाबत भुवय्या उंचावल्या होत्या. शासनानेदेखील भरीव निधी दिल्याचा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्षात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, निवृत्ती वेतन, विधवा निवृत्ती वेतन व अपंग निवृत्ती वेतन या तिनच योजनांच्या अनुदानात वाढ केली आहे. त्यातही अपंग व्यक्ती वगळता वयाचीही मोठी मर्यादा घालून दिलेली आहे. कारण या वाढीव अनुदानाचा लाभ 80 वर्षावरील लाभाथ्र्यानाच देण्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अपंगाच्या अनुदानातही केवळ शंभर रुपयांची नाममात्र वाढ केल्याचे दिसत आहे. वास्तविक मोठय़ा अवधीनंतर शासनाने निराधारांच्या योजनांच्या अनुदानात वाढ केली आहे. साहजिकच त्याचा लाभ सर्वच लाभाथ्र्याना मिळणे, अपेक्षित होते. मात्र या वाढीव अनुदानातून काहींना वगळून एक प्रकारे त्यांच्या तोंडास पानेच पुसली आहे. शासनाच्या अशा दुजाभावाच्या धोरणामुळे या लाभाथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तिन्ही योजनांसाठी कमी लाभार्थी आहेत. त्यामुळे थोडय़ाच लाभार्थ्ीना त्याचा लाभ मिळेल. परंतु मोठय़ा प्रमाणात असलेल्या संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्ीना वाढीव अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. पुढील जुलै महिन्यांपासून प्रत्यक्षात या वाढीव अनुदानाचा लाभ दिला जाणार असल्यामुळे शासनाने या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेऊन सरसकट सर्वानाच वाढीव अनुदान द्यावे. विशेषत: लोकप्रतिनिधींनी सद्या विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी लाभाथ्र्याची मागणी आहे. 4मार्च एडिंग त्यातच लोकसभेची आचार संहिता यामुळे गेल्या चार महिन्यांपासून निधीअभावी लाभाथ्र्याचे अनुदान रखडले. परिणामी लाभाथ्र्याचेही पगार रखडले आहेत. पगार नसल्यामुळे लाभार्थीपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पगारासाठी लाभार्थी रोजच संजय गांधी योजनेच्या कार्यालयात थेटे घालत आहेत. मात्र त्यांना भाडे खचरुन निराश होऊन परत जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे. बँकेत अनुदान जमा केले आहे, असे कार्यालयाकडून सांगितले जाते. जेव्हा लाभार्थी बँकेत तपास करतात तेव्हा जमा झाले नसल्याचे सांगण्यात येते. बँक आणि कार्यालयाच्या चिलम तंबाखूच्या खेळामुळे लाभार्थी अक्षरश: हैराण झाले आहेत. दरम्यान थकीत वेतनाबाबत संजय गांधी कार्यालयात तपास केला असता संजय गांधी वगळता इतर सर्व योजनेची रक्कम आली असून, त्यांच्या खात्यावर जमा केल्याचे सांगण्यात आले. मात्र लाभाथ्र्यानी मोठय़ा प्रमाणात मंगळवारीही पगाराकरीता कार्यालयात गर्दी केल्याचे चित्र होते.