शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

२१ हजार नागरिकांचे ‘इनकमिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रजाळे येथील कुटूंबांच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ अहवालानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रजाळे येथील कुटूंबांच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ अहवालानंतर तालुका आरोग्य विभाग कामाला लागला असून तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या २१ हजार नागरिकांचा आढावा घेतला जात आहे़ यामुळे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकाची माहिती मिळून क्वारंटाईन करणे सोपे होणार आहे़लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर परराज्यात तसेच राज्याच्या मोठ्या शहरांमध्ये अडकून पडलेले मूळ रहिवासी, नोकरदार आणि स्थलांतरीत झालेले मजूर हे परत येत आहेत़ परतणाऱ्या या सर्वांची रस्त्यांवर किंवा त्यांच्या घरी जावून स्क्रिनिंग केली जात आहे़ याचरदम्यान रजाळे येथील कुटूंब धुळे मार्गाने नंदुरबार येथे आले होते़ यानंतर यातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार समोर आला़ या प्रकारानंतर तालुका आरोग्य विभाग पुन्हा सर्तक झाला असून तालुक्याच्या विविध भागात आलेल्या नागरिकांचा आढावा घेत त्यांच्यातील लक्षणांची माहिती आशा आणि आरोग्य सेविकांकडून मागवली जात आहे़तालुका आरोग्य विभागाच्या या कामामुळे नंदुरबार तालुका नजीकच्या काळात कोरोनामुक्त होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे़तूर्तास जिल्ह्यातील सर्वाधिक तीन मोठे क्वारंटाईन सेंटर हे नंदुरबार तालुक्यात असून त्याठिकाणी सध्या ४१ जण दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे़ या कक्षांमध्ये दाखल केलेल्यांना सर्व प्रकारच्या सोयी देतानाच त्यांचे समुपदेशन करुन कोरोनाची भिती घालवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ तालुका आरोग्य विभागासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे गावोगावी नागरिकांसोबत संपर्कात असून बाहेरगावाहून आलेल्यांची तात्काळ चौकशी होत आहे़नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत २१ हजार ३७५ नागरिक बाहेरगावाहून आले आहेत़ पुण्या-मुंबईसह राज्यातील इतर शहरे आणि गुजरात राज्यातून ते परत आले आहेत़ मार्चपासून येथे आलेल्या या सर्व नागरिकांचे स्क्रिनिंग यापूर्वीच झाले आहेत़ वेळोवेळी आकड्यात वाढ होत असून प्रत्येकाची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक घरी जावून प्रवासाची माहिती घेत आहे़नंदुरबार शहरालगत होळ तर्फे हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत ५०, याच भागातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ३० तर शहरातील पटेलवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात तब्बल १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ एकूण १८० बेडची व्यवस्था असल्याने याठिकाणी ३१ वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कक्षांमधून आतापर्यंत २१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या तिन्ही कक्षांमध्ये ४१ जण दाखल आहेत़बाहेरगावाहून मोठ्या संख्येने येणाºया नागरिकांना क्वारंटाईन कक्षात ठेवणे शक्य नसल्याने त्यांच्या हातावर शिक्के मारुन घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे़