लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात पोषण इंडिया कार्यक्रम राबवण्यात येत आह़े यांतर्गत माता आणि बाळाच्या पोषण-आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठीच्या व्हाऊचर योजनेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याहस्ते करण्यात आल़ेरॅकेट बेंकैझर, महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लॅन इंडिया यांच्या सयुंक्त विद्यमाने हा कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात येणार असून महिला व बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून माता व बालकांर्पयत योजना पोहोचवली जाणार आह़े पोषण इंडिया कार्यक्रमाच्या उद्घाटप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ग्रामस्तरावर कार्यरत होणा:या या योजनेत वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक पोषण कार्यकर्ती आणि कॅल्स्टर समन्वयक यांचाही समावेश करण्यात आला आह़े माता व बालकाची माहिती अॅपवर संकलित केल्यानंतर योजनेत रोख रक्कम देण्याचीही तरतूद असून लाभार्थीचे खाते उघडण्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेशी जोडण्यात येणार आह़े यांतर्गत लाभार्थीच्या घरी जाऊन खाते उघडण्याचे काम ग्रामीण भागात सुरु आह़े योजनेत लाभार्थीची अडचण लक्षात घेऊन परिवहनासाठी भत्ता, जेवणाचा खर्च तसेच बुडीत मजुरीची तरतूद करण्यात आली आहे. व्हाऊचर योजनेमुळे लोक सहभागाला चालना देऊन अशासकीय संस्था, पंचायत राज संस्थान यांच्या सहभागाची खात्री सुनिश्चित होणार आह़े जिल्हा कुपोषण कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी यावेळी व्यक्त केली़
व्हाऊचर योजनेंतर्गत उच्च जोखमीच्या 200 गर्भवती माता आणि 400 सॅम बालकांसाठी वित्तीय सहायतेची तरतूद आहे. उच्च जोखमीच्या गर्भवती मातांना तीन दिवस अगोदर प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयात जास्तीत जास्त दिवस राहून काळजी घेणे, सॅम बालकाला 14 दिवस पोषण पुनर्वसन केंद्रात ठेवून त्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेण्यात येणार आह़े