शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

दुर्गम भाग : पावसाळ्यापूर्वी ११ हजार क्विंटल धान्य रवाना

By admin | Updated: June 1, 2014 00:11 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास तीन हजार ७०० क्विंटल गहू व सात हजार ७०० क्विंटल तांदळाचा समावेश आहे.

 नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास तीन हजार ७०० क्विंटल गहू व सात हजार ७०० क्विंटल तांदळाचा समावेश आहे. याशिवाय नवसंजीवन योजनेतील एकूण ६४ गावांमध्ये धान्यसाठा करून ठेवण्यात आला आहे. यंदा ज्वारी नसल्याने ती रेशन दुकानांवर दिली जाणार नाही. दुर्गम भागात पावसाळ्यात संपर्क तुटतो. अनेक ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसतात. त्यामुळे प्रशासन अशा गावांमध्ये जून ते सप्टेंबर अर्थात पावसाळ्याच्या चार महिन्यांचा धान्यसाठा आधीच पाठवून देत असते. त्यामुळे दुर्गम भागातील रेशन शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळू शकते. यंदादेखील जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी धान्यसाठा पाठविण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आठवडाभरात ते पूर्ण होणार आहे. द्वारपोच जिल्ह्यात द्वारपोच योजनेअंतर्गत शासन रेशन दुकानांना शिधापुरवठा करीत असते. जे दुकानदार स्वत:च्या वाहनाने शिधा नेत असतात त्यांना भाड्याची उचल दिली जाते. द्वारपोचसाठी जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची वाहने लावण्यात आली आहेत. जिल्ह्यात ९९७ रेशन दुकानातील एकूण तीन लाख १७ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांच्यासाठी दर महिन्याला गहू व तांदूळ उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्ह्यातील नर्मदा काठावरील २७ गावे व इतर आठ गावे अशा ३५ गावांना गहू व तांदूळ पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ३५ गावांना संपूर्ण चार महिन्यांचा गहू व तांदळाचा साठा दिला जाणार आहे. या गावांमध्ये पावसाळ्यात सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या फुगवट्याने बेटाचे स्वरूप येते. त्यामुळे तीन महिने या गावांशी रस्त्याने संपर्क तुटतो. याअंतर्गत या गावांना गहू व तांदूळ पुरविण्यात आला असल्याचे पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. तांदळाचा सर्वाधिक साठा जिल्ह्यात तांदळाचा सर्वाधिक साठा उपलब्ध आहे. सात हजार ७०० क्विंटल तांदूळ दुर्गम भागातील गावांना दिला जाणार आहे तर तीन हजार ७०० क्विंटल गहूदेखील पुरविण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार व युनिटनुसार हे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. साठवण्याची समस्या दुर्गम भागात एका रेशनदुकानदाराला चार महिन्यांचा धान्यसाठा पुरविला जात असला तरी एवढा साठा ठेवण्याची समस्या निर्माण होते. कारण दुर्गम भागात पक्के शेड नाही, कुडाच्या घरात हा धान्यसाठा राहतो. संततधार पावसात तसेच ओलाव्यामुळे तो खराब होण्याची देखील शक्यता असते. २५ गुदामात साठा जिल्ह्यात एकूण २४ गुदाम शासकीय तर एक गुदाम खाजगी स्वरूपात आहे. एकूण २५ गुदामात जिल्ह्यातील धान्यसाठा साठविण्यात येतो. दर महिन्याला दोंडाईचा रेल्वेस्थानकातून येणारे धान्य त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुदामात ठेवण्यात येते.