शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

दुर्गम भाग : पावसाळ्यापूर्वी ११ हजार क्विंटल धान्य रवाना

By admin | Updated: June 1, 2014 00:11 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास तीन हजार ७०० क्विंटल गहू व सात हजार ७०० क्विंटल तांदळाचा समावेश आहे.

 नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास तीन हजार ७०० क्विंटल गहू व सात हजार ७०० क्विंटल तांदळाचा समावेश आहे. याशिवाय नवसंजीवन योजनेतील एकूण ६४ गावांमध्ये धान्यसाठा करून ठेवण्यात आला आहे. यंदा ज्वारी नसल्याने ती रेशन दुकानांवर दिली जाणार नाही. दुर्गम भागात पावसाळ्यात संपर्क तुटतो. अनेक ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसतात. त्यामुळे प्रशासन अशा गावांमध्ये जून ते सप्टेंबर अर्थात पावसाळ्याच्या चार महिन्यांचा धान्यसाठा आधीच पाठवून देत असते. त्यामुळे दुर्गम भागातील रेशन शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळू शकते. यंदादेखील जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी धान्यसाठा पाठविण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आठवडाभरात ते पूर्ण होणार आहे. द्वारपोच जिल्ह्यात द्वारपोच योजनेअंतर्गत शासन रेशन दुकानांना शिधापुरवठा करीत असते. जे दुकानदार स्वत:च्या वाहनाने शिधा नेत असतात त्यांना भाड्याची उचल दिली जाते. द्वारपोचसाठी जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची वाहने लावण्यात आली आहेत. जिल्ह्यात ९९७ रेशन दुकानातील एकूण तीन लाख १७ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांच्यासाठी दर महिन्याला गहू व तांदूळ उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्ह्यातील नर्मदा काठावरील २७ गावे व इतर आठ गावे अशा ३५ गावांना गहू व तांदूळ पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ३५ गावांना संपूर्ण चार महिन्यांचा गहू व तांदळाचा साठा दिला जाणार आहे. या गावांमध्ये पावसाळ्यात सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या फुगवट्याने बेटाचे स्वरूप येते. त्यामुळे तीन महिने या गावांशी रस्त्याने संपर्क तुटतो. याअंतर्गत या गावांना गहू व तांदूळ पुरविण्यात आला असल्याचे पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. तांदळाचा सर्वाधिक साठा जिल्ह्यात तांदळाचा सर्वाधिक साठा उपलब्ध आहे. सात हजार ७०० क्विंटल तांदूळ दुर्गम भागातील गावांना दिला जाणार आहे तर तीन हजार ७०० क्विंटल गहूदेखील पुरविण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार व युनिटनुसार हे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. साठवण्याची समस्या दुर्गम भागात एका रेशनदुकानदाराला चार महिन्यांचा धान्यसाठा पुरविला जात असला तरी एवढा साठा ठेवण्याची समस्या निर्माण होते. कारण दुर्गम भागात पक्के शेड नाही, कुडाच्या घरात हा धान्यसाठा राहतो. संततधार पावसात तसेच ओलाव्यामुळे तो खराब होण्याची देखील शक्यता असते. २५ गुदामात साठा जिल्ह्यात एकूण २४ गुदाम शासकीय तर एक गुदाम खाजगी स्वरूपात आहे. एकूण २५ गुदामात जिल्ह्यातील धान्यसाठा साठविण्यात येतो. दर महिन्याला दोंडाईचा रेल्वेस्थानकातून येणारे धान्य त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुदामात ठेवण्यात येते.