शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित आढळणाऱ्या गावात तातडीने विलगीकरण कक्ष सुरू करा- डॉ. राजेंद्र भारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, ...

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, रॅपीड अँन्टीजेन टीमच्या सदस्यांची बैठक घ्यावी आणि कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची व्यवस्था करावी. गटविकास अधिकारी यांनी गावातील समाजमंदिर, शाळा, सभागृहात विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी उपाययोजना करावी. ग्रामपंचायतीमार्फत कोरोना बाधितांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. आशा कार्यकर्तीमार्फत ऑक्सिजन तपासणी करावी. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विलगीकरण कक्षाचे प्रमुख म्हणून काम पहावे.

बाधित व्यक्तीला १० दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे. पुढील महिनाभरात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता कोरोनाबाधित व्यक्ती कुटुंबासोबत राहणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे.

बाधित व्यक्तीची ऑक्सिजन पातळी खालावल्यास जवळच्या कोविड रुग्णालयात संदर्भित करण्यात यावे. अधिक कोरोनाबाधित आढळणाऱ्या गावांत उपघटना व्यवस्थापकाची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्याने विलगीकरण कक्ष आणि तेथील व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घ्यावा. आशा सेविकांमार्फत संपर्क साखळी शोधण्याचा प्रयत्न करावा. नियोजनबद्ध पद्धतीने ही सर्व कार्यवाही करावी. गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी अधिकाधिक विलगीकरण कक्ष सुरू करण्यावर भर द्यावा. विलगीकरण कक्षातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. नव्याने येणाऱ्या रुग्णवाहिकांचा उपयोग केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठीच करावा. ग्रामपंचायत पातळीवर जनजागृतीवर भर देण्यात यावा. जनता कर्फ्यूच्या कालावधीत बाजार भरणाऱ्या गावात निर्जंतुकीकरणाचे काम करावे. गर्दीच्या ठिकाणी भाजीच्या गाड्या उभ्या राहणार नाहीत. त्याऐवजी मोकळ्या पटांगणात उभ्या राहतील याची दक्षता घ्यावी.

घटना व्यवस्थापकांनी नव्या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळल्यास त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा, बँकेच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, बँकेत गर्दी होणार नाही याबाबत नियोजन करण्यात यावे, सरकारी कार्यालयातील अभ्यागतांना परवानगी देऊ नये, ऑक्सिजन पातळी खालावलेल्या रुग्णांनाच रेमडिसीवीर औषध देण्यात यावे, रुग्णालयाची रेमडिसीवीरबाबत मागणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे मागणी घ्यावी आणि त्यानुसार थेट रुग्णालयांना औषध पुरविण्यात यावे, दररोज पाच हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने तालुका स्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.