शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

महाराष्ट्राच्या नावाने गुजरातमधून हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:38 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना या घाटाच्या नावाने हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून यासंदर्भातील वास्तव चित्र प्रशासनासमोर येवूनही त्याकडे दुर्लक्ष होत ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना या घाटाच्या नावाने हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून यासंदर्भातील वास्तव चित्र प्रशासनासमोर येवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. तापी नदीतील वाळू ही बांधकामासाठी उत्कृष्ट मानली जाते. त्यामुळे या वाळूला थेट विदेशातही मागणी आहे. त्यामुळे येथील वाळूचे ठेके घेण्यासाठी अनेक बडय़ा मान्यवरांची स्पर्धा असते. यावर्षी देखील डिसेंबर 2017 मध्ये जिल्ह्यातील चार वाळू ठेक्यांचा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गतच सावळदा येथील वाळू घाटही मंजूर करण्यात आला आहे. सावळदा हे गाव गुजरातच्या हद्दीवरच आहे. दुसरीकडे गुजरातमध्येही तापी नदीवरच व्यावल, अंतुर्ली, निझर येथे ठेके देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सावळदा घाटावर वाळूची उपलब्धता समाधानकारक नाही. असे असतांनाही गुजरातच्या ठेकेदाराने सावळदाच्या नावावर हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची मध्यंतरी स्थानिक प्रशासनाने दखल घेवून पंचनामेही केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, तहसीलदारांनी वस्तूस्थिती लक्षात घेवून सावळदा येथील ठेका रद्द करण्याबाबतही जिल्हा प्रशासनाला कळविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे, दुसरीकडे वाका चौफुलीपासून तर व्यावलर्पयत मुख्य रस्त्यावरून प्रवास केल्यास या भागात लाखो ब्रास वाळूचे ढिगारे दिसून येतात. वाका चार रस्ता ते नंदुरबार तसेच वाका चार रस्ता ते प्रकाशा या रस्त्यावर रोज शेकडो वाळूचे डंपर ये-जा करतांना दिसतात. विशेष म्हणजे ही वाहतूक करतांना नियमाचे पालन होत नाही. वाहनातील वाळू झाकली जात नसल्याने ती वाळू उडते. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना त्याचा प्रचंड फटका बसतो. रस्त्यावरच मोठय़ा प्रमाणावर वाळू पसरत असल्याने वाहनेही त्यावरून घसरतात त्यातून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच याच कारणाने एका दुचाकी चालकाचा मृत्यू   झाला.   रोज दिवसाढवळ्या राजरोसपणे वाळूची ही तस्करी सुरू असतांना त्याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषत: वाळू वाहनांमुळे वाहनधारकांचे होणारे हाल आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाळू माफियांची मुजोरी वाढली असून अधिका:यांना धमकवणे, त्यांचे अपहरणाचे प्रकारही घडले असून याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी देखील आहेत. असे असतांनाही या माफियांवर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे.