शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या नावाने गुजरातमधून हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:38 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना या घाटाच्या नावाने हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून यासंदर्भातील वास्तव चित्र प्रशासनासमोर येवूनही त्याकडे दुर्लक्ष होत ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्ती भागात वाळूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी सुरू असून त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सिमावर्ती भागावरील सावळदा येथील वाळू घाटावर वाळूच नसतांना या घाटाच्या नावाने हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून यासंदर्भातील वास्तव चित्र प्रशासनासमोर येवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. तापी नदीतील वाळू ही बांधकामासाठी उत्कृष्ट मानली जाते. त्यामुळे या वाळूला थेट विदेशातही मागणी आहे. त्यामुळे येथील वाळूचे ठेके घेण्यासाठी अनेक बडय़ा मान्यवरांची स्पर्धा असते. यावर्षी देखील डिसेंबर 2017 मध्ये जिल्ह्यातील चार वाळू ठेक्यांचा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गतच सावळदा येथील वाळू घाटही मंजूर करण्यात आला आहे. सावळदा हे गाव गुजरातच्या हद्दीवरच आहे. दुसरीकडे गुजरातमध्येही तापी नदीवरच व्यावल, अंतुर्ली, निझर येथे ठेके देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सावळदा घाटावर वाळूची उपलब्धता समाधानकारक नाही. असे असतांनाही गुजरातच्या ठेकेदाराने सावळदाच्या नावावर हजारो ब्रास वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची मध्यंतरी स्थानिक प्रशासनाने दखल घेवून पंचनामेही केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, तहसीलदारांनी वस्तूस्थिती लक्षात घेवून सावळदा येथील ठेका रद्द करण्याबाबतही जिल्हा प्रशासनाला कळविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे, दुसरीकडे वाका चौफुलीपासून तर व्यावलर्पयत मुख्य रस्त्यावरून प्रवास केल्यास या भागात लाखो ब्रास वाळूचे ढिगारे दिसून येतात. वाका चार रस्ता ते नंदुरबार तसेच वाका चार रस्ता ते प्रकाशा या रस्त्यावर रोज शेकडो वाळूचे डंपर ये-जा करतांना दिसतात. विशेष म्हणजे ही वाहतूक करतांना नियमाचे पालन होत नाही. वाहनातील वाळू झाकली जात नसल्याने ती वाळू उडते. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना त्याचा प्रचंड फटका बसतो. रस्त्यावरच मोठय़ा प्रमाणावर वाळू पसरत असल्याने वाहनेही त्यावरून घसरतात त्यातून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच याच कारणाने एका दुचाकी चालकाचा मृत्यू   झाला.   रोज दिवसाढवळ्या राजरोसपणे वाळूची ही तस्करी सुरू असतांना त्याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषत: वाळू वाहनांमुळे वाहनधारकांचे होणारे हाल आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाळू माफियांची मुजोरी वाढली असून अधिका:यांना धमकवणे, त्यांचे अपहरणाचे प्रकारही घडले असून याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी देखील आहेत. असे असतांनाही या माफियांवर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे.