शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळ कनेक्शनची पालिकेला डोकेदुखी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

नंदुरबार : शहरात पाणी टंचाईची कुठलीही समस्या गेल्या दहा वर्षात निर्माण झाली नाही. दर एक दिवसाआड पाऊण ते एक ...

नंदुरबार : शहरात पाणी टंचाईची कुठलीही समस्या गेल्या दहा वर्षात निर्माण झाली नाही. दर एक दिवसाआड पाऊण ते एक तास शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. परंतु अद्यापही शहरात एकुण घरांच्या तुलनेत आठ ते दहा टक्के अवैध नळ कनेक्शन असल्याचे चित्र आहे. पालिकेने वारंवार आवाहन करूनही ते नळ कनेक्शन अधिकृत केले जात नसल्याची स्थिती आहे. आता २४ तास पाणी पुरवठा योजना राबविली जाणार असून नुकतेच वॅाटर ॲाडीट देखील करण्यात आले आहे.

नंदुरबार पालिकेर्फे शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. २५ टक्के पाणी पुरवठा हा आंबेबारा धरणातून केला जातो. शहरातील लोकसंख्या व घरांची संख्या लक्षात घेता दर एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. तांत्रिक समस्या वगळता शहरात कधीही पाणी टंचाई निर्माण झालेली नाही. २०४० च्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन शहरात नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे. आता लवकरच वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत २४ तास नळांना पाणी राहणार आहे. त्यासाठी मिटर सिस्टीम लावली जाणार आहे. अर्थात सद्या आहे त्या घरपट्टीच्या तुलनेतच मिटरद्वारेही पाणी मिळू शकेल असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासाठी नुकतेच त्रसस्थ संस्थेतर्फे शहरात वॅाटर ॲाडिट देखील करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेला आता गती देण्यात येणार आहे.

दोन वर्षांपासून नंदुरबारचा विरचक प्रकल्प हा ९० टक्केपेक्षा अधिक भरत आहे. त्यामुळे शहरवासी पाण्याबाबत सुदैवी ठरत आहेत. अर्थात प्रकल्प केवळ ४० टक्के भरलेला असतांनाही पालिकेने नियोजनपूर्वक पाणी पुरवठा केेल्याने त्यावेळी देखील पाणी टंचाई निर्माण झालेली नव्हती. अवैध नळ कनेक्शन धारकांनी आपले कनेक्शन वैध करून घेतले आणि थकीत पाणी पट्टी नियमित भरली तर पालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात नवीन योजनेत अवैध नळ कनेक्शन हे उघडकीस येणार आहेतच असेही बोलले जात आहे.

८ टक्के अवैध नळजोडणी...

शहरात जवळपास दहा टक्के घर मालकांनी अवैध नळ जोडणी घेतले असल्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे. अशा जोडणी धारकांना वेळोवेळी आवाहन करून जोडणी वैध करून घेण्याचेही आवाहन करण्यात आलेले आहे.

n शहरातील अनेक मालमत्ता धारकांनी मालमत्ता करासह नळ पट्टी देखील थकविल्याचे चित्र आहे. वास्तविक पालिकेने कम्प्लीशन व नॅान कम्प्लीशन असलेल्या घरांना सारखीच नळपट्टी आकारलेली आहे. अ वर्ग पालिका असूनही सर्वात कमी नळीपट्टी आकारणारी खान्देशातील नंदुरबार एक पालिका आहे.

कोट....

पाणी पुरवठाबाबत नंदुरबारक जनता सुदैवी आहे. राज्यात सर्वत्र पाणी टंचाई असतांना नंदुरबारात नियमित पाणी पुरवठा होत होता. यंदाही विरचक प्रकल्प तुडूंब भरला आहे. त्यामुळे चिंता नाही. असे असले तरी अवैध नळ कनेक्शनमुळे पालिकेचा महसूल बुडतो. शिवाय वेळेवर पाणी पट्टी देखील अनेकजण भरत नाहीत. याबाबत जनतेने मानसिकता बदलणे आवश्यक आहे. लवकरच वाढीव पाणी पुरवठा योजना अंमलात येणार आहे.

-रत्ना चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा,नंदुरबार.