शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन दिवसात बिल भरले नाही, तर जिल्हा जाणार १०० वर्ष मागे

By भूषण.विजय.रामराजे | Updated: March 30, 2023 16:54 IST

सार्वजनिक पथदिवे, पाणी योजना यांची थकबाकी जमा करण्यासाठी निधी नसल्याने समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.

नंदुरबार : येत्या दोन दिवसात जिल्ह्यात २ हजार पथदिव्यांचे बिल न भरल्यास नंदुरबार जिल्हा १०० मागे जाणार आहे. महावितरणची पथदिव्यांच्या बिलापोटी तब्बल २१९ कोटी रुपयांची थकबाकी असून ३१ मार्च ही रक्कम भरण्याची शेवटची मुदत आहे. ही रक्कम न भरल्यास जोडण्या कापण्यात येऊन वीज पुरवठा खंडीत होणार असून रस्त्यांवर अंधार पसरणार आहे. 

सार्वजनिक पथदिवे, पाणी योजना यांची थकबाकी जमा करण्यासाठी निधी नसल्याने समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत. परिणामी २ एप्रिलनंतर काय असा प्रश्न आहे. पथदिव्यांचे कनेक्शन कट झाल्यास ग्रामीण आणि शहरी भागात १०० वर्षांपूर्वीच्या कंदीलांचा काळ येतो की, अशी चर्चा सध्या शासकीय यंत्रणांमध्ये सुरू आहे.

महावितरणची जिल्ह्यातील ८ हजार ४७८ ग्राहकांकडे २८४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. यात पथदिव्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून १ हजार ८१८ पथदिव्यांच्या जोडण्या करण्यात आल्या आहेत. या पथदिव्यांची एकूण थकबाकी ही २१९ कोटी ६१ लाख रुपयांची आहे. गेल्या १० वर्षात ही थकीत रक्कम पूर्णपणे भरली गेली नसल्याने त्याच्या वाढ झाली आहे. पथदिव्यांमध्ये चाैकाचाैकात उभारण्यात आलेल्या उत्तुंग हायमस्टचाही समावेश आहे.

 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार