शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

५० मेंढपाळ कुटुंबावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ कुटुंबांना गाव बंदी बरोबरच जिल्हा बंदीमुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. शेतमालक व एक-दोन व्यक्ती व्यतिरिक्त या कुटुंबांना अजून कोणाचीच मदत मिळाली नाही. एवढेच नव्हे शासनाच्या मदतीपासूनदेखील ते उपेक्षित आहे. निदान शासनाने तरी आम्हाला मदतीचा हात द्यावा अथवा आमच्या गावाकडे जाऊ द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी मेंढपाळ कुटुंबे दरवर्षी दिवाळीनंतर मेंढपाळ कुटुंबे स्थलांतर करीत असतात. तब्बल पाच ते सहा महिने ते इकडेच राहत असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते पुन्हा आपल्या गावाकडे जात असतात. यंदाही नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील शनिमांडळ, रनाळा, निजामपूर, निसर्डे येथील साधारण ५० कुटुंबे तळोदा तालुक्यातील चिनोदा, भवर, प्रतापपूर, सिलींगपूर, करडे, काजीपूर, तलावडी, जावदा या गावांमधील शेत शिवारात स्थलांतरीत झाले आहे. सद्या कोरोना या महामारीने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. साहजिकच ग्रामीण भागातही त्याची दहशत पसरली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावा-गावातील गावकरी आपल्या गावाच्या सीमादेखील बंद करू लागले आहेत. तथापि जिल्हा बंदीबरोबरच गाव बंदीचा फटका मेंढपाळ कुटुंबांनादेखील बसत आहेत. कारण शेत शिवारातून गावात किराणा अथवा दळण दळण्यासाठी येवू शकत नाही. परिणामी त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आल्याची व्यथाही या कुटुंबांनी बोलून दाखविली आहे. एवढेच नव्हे शासनाची अथवा स्वयंसेवी संस्थांची मदत अजून पोहोचली नसल्याचे ते म्हणतात. एकीकडे कुणीही अन्नापासून उपाशी राहणार नाही असे सरकार म्हणते. मात्र दोन वेळच्या जेवणासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. आमच्या कुटुंबासोबत आमची लहान बालकेदेखील आहेत.या बंदीमुळे त्यांना वेळेवर जेवण देऊ शकत नाही, असेही ते सांगतात. वास्तविक आमचे संपूर्ण आयुष्यच भटकंतीचे असते. त्यामुळे शासनाच्या योजनेशिवाय जीवन जगत असतो. निदान महामारी सारख्या नैसर्गिक आपत्तीत तरी शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासनानेच कानावर हात ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासनाने आम्हाला रेशन द्यावे, अन्यथा आम्हाला आमच्या गावाकडे स्थलांतरीत करू द्यावे, अशी अपेक्षा कुटुंबांनी व्यक्त केली आहे.कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपसातील संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय असल्यामुळे ही कुटुंबेदेखील एकमेकांपासून इतरत्र विखुरले आहेत. काही कुटुंबे तर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. या कुटुंबांना काही शेतमालक थोड्याफार प्रमाणात जीवनावश्यक वस्तु देत आहेत. आमलाड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामराव आघाडे व तेथील ग्रामसेवक चुडामण सरगर यांनी काही काही कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीटे आदी वस्तुंचे वाटप केले होते. त्यांच्याकडे सद्या थोडेफार धान्य असले तरी गावबंदीमुळे दळणाचा प्रश्न आहे. निदान त्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे त्यांचे म्हणणे आहे.मेंढ्या चारण्यासाठी साक्री तालुक्यातील निसर्डे येथून तळोदा तालुक्यातील शेत शिवारात आले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे कुणीच गावात येवू देई ना साहजिकच किराणा अथवा दळण दळण्याची समस्या उभी राहिली असून, यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. निदान शासनाने तरी रेशन बरोबरच आवश्यक वस्तु उपलब्ध करून द्याव्यात.-गढवर करे, मेंढपाळ, निसर्डे, ता.साक्री