शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

५० मेंढपाळ कुटुंबावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ कुटुंबांना गाव बंदी बरोबरच जिल्हा बंदीमुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. शेतमालक व एक-दोन व्यक्ती व्यतिरिक्त या कुटुंबांना अजून कोणाचीच मदत मिळाली नाही. एवढेच नव्हे शासनाच्या मदतीपासूनदेखील ते उपेक्षित आहे. निदान शासनाने तरी आम्हाला मदतीचा हात द्यावा अथवा आमच्या गावाकडे जाऊ द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी मेंढपाळ कुटुंबे दरवर्षी दिवाळीनंतर मेंढपाळ कुटुंबे स्थलांतर करीत असतात. तब्बल पाच ते सहा महिने ते इकडेच राहत असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते पुन्हा आपल्या गावाकडे जात असतात. यंदाही नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील शनिमांडळ, रनाळा, निजामपूर, निसर्डे येथील साधारण ५० कुटुंबे तळोदा तालुक्यातील चिनोदा, भवर, प्रतापपूर, सिलींगपूर, करडे, काजीपूर, तलावडी, जावदा या गावांमधील शेत शिवारात स्थलांतरीत झाले आहे. सद्या कोरोना या महामारीने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. साहजिकच ग्रामीण भागातही त्याची दहशत पसरली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावा-गावातील गावकरी आपल्या गावाच्या सीमादेखील बंद करू लागले आहेत. तथापि जिल्हा बंदीबरोबरच गाव बंदीचा फटका मेंढपाळ कुटुंबांनादेखील बसत आहेत. कारण शेत शिवारातून गावात किराणा अथवा दळण दळण्यासाठी येवू शकत नाही. परिणामी त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आल्याची व्यथाही या कुटुंबांनी बोलून दाखविली आहे. एवढेच नव्हे शासनाची अथवा स्वयंसेवी संस्थांची मदत अजून पोहोचली नसल्याचे ते म्हणतात. एकीकडे कुणीही अन्नापासून उपाशी राहणार नाही असे सरकार म्हणते. मात्र दोन वेळच्या जेवणासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. आमच्या कुटुंबासोबत आमची लहान बालकेदेखील आहेत.या बंदीमुळे त्यांना वेळेवर जेवण देऊ शकत नाही, असेही ते सांगतात. वास्तविक आमचे संपूर्ण आयुष्यच भटकंतीचे असते. त्यामुळे शासनाच्या योजनेशिवाय जीवन जगत असतो. निदान महामारी सारख्या नैसर्गिक आपत्तीत तरी शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासनानेच कानावर हात ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासनाने आम्हाला रेशन द्यावे, अन्यथा आम्हाला आमच्या गावाकडे स्थलांतरीत करू द्यावे, अशी अपेक्षा कुटुंबांनी व्यक्त केली आहे.कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपसातील संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय असल्यामुळे ही कुटुंबेदेखील एकमेकांपासून इतरत्र विखुरले आहेत. काही कुटुंबे तर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. या कुटुंबांना काही शेतमालक थोड्याफार प्रमाणात जीवनावश्यक वस्तु देत आहेत. आमलाड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामराव आघाडे व तेथील ग्रामसेवक चुडामण सरगर यांनी काही काही कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीटे आदी वस्तुंचे वाटप केले होते. त्यांच्याकडे सद्या थोडेफार धान्य असले तरी गावबंदीमुळे दळणाचा प्रश्न आहे. निदान त्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे त्यांचे म्हणणे आहे.मेंढ्या चारण्यासाठी साक्री तालुक्यातील निसर्डे येथून तळोदा तालुक्यातील शेत शिवारात आले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे कुणीच गावात येवू देई ना साहजिकच किराणा अथवा दळण दळण्याची समस्या उभी राहिली असून, यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. निदान शासनाने तरी रेशन बरोबरच आवश्यक वस्तु उपलब्ध करून द्याव्यात.-गढवर करे, मेंढपाळ, निसर्डे, ता.साक्री