शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भितीतही जोपासला जातोय माणूसकीचा ‘ओलावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला दूर पळवायचे असले तर विलगीकरण हा एकमेव पर्याय आहे़ लागण झाल्यास आपल्या माणसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला दूर पळवायचे असले तर विलगीकरण हा एकमेव पर्याय आहे़ लागण झाल्यास आपल्या माणसांपासून दूर राहून कोरोनासोबत लढा शक्य आहे़ हे खरं असलं तरी कोरोनाच्या या भितीतही माणूसकीचा ओलावा मात्र कायम असल्याचे नंदुरबारात दिसून येत आहे़ शहरातील बाफना आणि पुजारा कुटूंबियांनी पोलीस, सफाई कामगार आणि गरजेच्या वेळी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत अन्नछत्र सुरु केले असून त्यांच्यापर्यंत दररोज अन्न पोहोचते करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे़शहरातील मिना कॉम्पलेक्स परिसरात राहणाºया बाफना कुटूंबाला चार दिवसांपूर्वीच्या जनता कर्फ्यू सुरु असताना महिला आणि पुरुष पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना जवळून बघण्याची संधी मिळाली़ घरासमोरच बंदोबस्त लागला असल्याने पोलीसांच्या हालचाली टिपणाºया जे़एच़बाफना यांनी पोलीस बांधवांना दिवसभर जेवणच मिळाले नसल्याचे लक्षात आले़ पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांच्या पत्नी आणि त्यांनी तातडीने घरातील गुजराती प्रकाराचा नाश्ता डब्यात भरुन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला़ दिवसभराच्या धावपळीने थकवा असलेल्या पोलीसांनी थोडे का होईना मिळालेले अन्न ग्रहण करत बाफना कुटूंंबाचे कौतूक केले़ याच दरम्यान शहरातील दुसरे आणखी सेवाभावी राजू पुजारा यांची आणि जे़एच़बाफना या दोघांची भेट झाली़ यावेळी संचारबंदी काळात दोघांनी मिळून पोलीसांना मोफत जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला होता़ गेल्या चार दिवसांपासून पुजारा आणि बाफना कुटूंबिय संयुक्तपणे शहरात सीबी पेट्रोलियम ते साक्री नाक्यापर्यंत नियुक्त असलेल्या सर्व पोलीस कर्मचाºयांना अन्नपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहेत़ विशेष म्हणजे सकाळ आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेस त्यांच्याकडून जेवण देण्यात येत आहे़ हे जेवण तयार करण्यासाठी एका माणसाला पैसे देऊन त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने तयार करुन घेत त्याचा पुरवठा करण्यात येतो़

अन्न देण्यापूर्वी सॅनेटायझरचा वापरदरम्यान बाफना आणि पुजारा कुटूंबियांच्या या अनोख्या सेवाभावात आरोग्याची काळजी घेण्याचा मात्र विसर पडलेला नाही़ जेवण वाटप करण्यापूर्वी जो व्यक्ती जेवण वाढणार त्याला आणि ज्याला द्यायचे आहे त्याला सॅनेटायझर आणि हँडवॉश सक्तीचे आहे़ दोन्ही गोष्टींचा योग्य वापर झाल्यानंतर मगच जेवण दिले जाते़ शहरातील किमान आठ पॉर्इंटवर नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दुचाकींवरुन हे जेवण वाहून नेले जाते़ केवळ सहकार्य म्हणून हा उपक्रम सुरु असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली़ पोलीसांनीही त्यांच्या सेवाभावाचे स्वागत केले आहे़ सकाळ आणि सायंकाळी असा दोन वेळ अन्नाचा पुरवठा होतो आहे़ विशेष म्हणजे आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून पोलीस बांधवांना दोन्ही कुटूंबियांना श्रीखंड देत त्यांचे तोंड गोड केले़

इतर ठिकाणीही गरजकोणत्याही प्रकारे गर्दी न करता योग्यपणे हा प्रयोग सुरु आहे़ यात आता शहरातील इतरांनीही दोन्ही कुटूंबांना सहकार्य करण्याचा निर्णय घेत पैसे देऊ केले आहेत़ परंतू पैश्यांपेक्षा सहकार्य देण्याचे दोन्ही कुटूंंबिय सांगत आहेत़एकीकडे सेवाभावी संस्थेविनाच पुढे आलेल्या या कुटूंबांचे कौतूक होत असताना दुसरीकडे शहराबाहेरील पाल टाकून वास्तव्य करणाऱ्यांची मात्र आबाळ सुरु आहे़ छोट्यामोठ्या वस्तू विक्री करुन गुजराण करणाºया या नागरिकांनाही अन्न कमावण्याचा हक्क आहे़ परंतू संचारबंदीमुळे त्यांचे किरकोळ व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या घरी खायलाच नसल्याचे चित्र आहे़ यामुळे त्यांच्याकडेही सेवाभावींनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़