शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकांनी जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहिले जाते. अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध होणारी रिक्षा सर्वसामान्यांना प्रवासासाठी हक्काचे व्यासपीठ ...

सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहिले जाते. अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध होणारी रिक्षा सर्वसामान्यांना प्रवासासाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, ठराविक अंतरावर प्रवाशांची वाहतूक, घरगुती सामानाची वाहतूक, वेळप्रसंगी रुग्णालयात जाण्यासाठी प्रामुख्याने रिक्षाचा वापर सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातो. रिक्षाचा व्यवसाय किफायतशीर असल्याने अनेक शिक्षित तरुणांना रोजगाराचा प्रमुख आधार ठरला आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक बेरोजगारांनी रिक्षा व्यवसाय करण्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी चौकाचौकात सहजगत्या रिक्षा उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे ठरले आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदरच गेल्या वर्षभरापासून या संकटामुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आला होता. आता कुठेतरी स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती. पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आता जगायचे कसे? असा सवाल रिक्षावाल्यांना छळतो आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत रिक्षावाल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपयांची मदत वर्ग करण्याचे जाहीर केले आहे. याचा फायदा अल्प प्रमाणात असला तरी ज्या रिक्षाचालकांची नोंदणी नाही अशांनी आता करायचे काय? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे. सरसकट प्रत्येक रिक्षाचालकाला शासनाने दीड हजार रुपये अनुदान देण्याची गरज असल्याचे मत रिक्षाचालक व्यक्त करीत आहेत.

उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. व्यवसाय करण्याची इच्छा असताना साथ मिळाली नाही. अशा परिस्थितीत मित्रांकडून उसनवार पैसे घेऊन रिक्षा घेतली. दिवस-रात्र मेहनत करून कुटुंबीयांचे पोट भरत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प होणार असल्याने आता पुन्हा करायचे काय असा प्रश्न छळतो आहे.

-नितीन कश्यप, रिक्षाचालक, शहादा

कोरोना विषाणू संकटामुळे गेल्या वर्षभरापासून प्रचंड हाल झाले आहे. रिक्षा विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज थकले आहे तर त्यावरील व्याजाचा डोंगर वाढला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने जाहीर केलेली मदत सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत अल्प आहे.

-पिंटू चौधरी, रिक्षाचालक, शहादा

बँकेकडून कर्ज घेऊन रिक्षा घेतली व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू केली. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा व खाजगी क्लासेस बंद असल्याने व्यवसाय झाला नाही. अशा परिस्थितीत थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावला आहे. शासनाने अल्प मदत जाहीर करण्याऐवजी थकीत कर्जावरील व्याज माफी दिली पाहिजे. रिक्षा चालक जगण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

-दीपक जव्हेरी, रिक्षाचालक, शहादा