शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

रुग्णालयाला मिळेना सुसज्ज इमारत यातून कसा होईल आयुष्यमान भारत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

नंदुरबार : दुर्गम भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी जमाना ता. अक्कलकुवा येथे सुरु केलेल्या ग्रामीण रुग्णालयाला इमारत मंजूर करुन ...

नंदुरबार : दुर्गम भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी जमाना ता. अक्कलकुवा येथे सुरु केलेल्या ग्रामीण रुग्णालयाला इमारत मंजूर करुन त्याचे बांधकामही पूर्ण करण्यात आले होते. परंतू गेल्या चार वर्षापासून तयार झालेल्या इमारतीचे हस्तांतरण रखडले असल्याने आयुष्यमान भारत या योजनेचाच एकप्रकारे बोजवारा उडाला आहे.

जमाना येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यात आल्यानंतर सुसज्ज दर्जाची इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम करण्याचे ठरवण्यात आले होते. यासाठी जागा निश्चित करुन आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा विभागाला इमारत बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानंतर संबधित विभागाने ठेकेदार नियुक्त करत २०१४ मध्ये इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. हे बांधकाम २०१६-१७ या वर्षात पूर्ण करण्यात आले आहे. यानंतर ही इमारत सुरु होऊन रुग्णसेवा होईल अशी अपेक्षा असताना चार वर्ष उलटूनही तिचे हस्तांतरण झालेले नाही. ही इमारत रुग्णालयाच्या वापरालायक नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. आर.डी.भोये यांनी ती ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यानंतर गेल्या चार वर्षात या इमारतीची मात्र प्रचंड दुरवस्थ झाली आहे.

दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे धारिष्ट्यही शहादा येथील बांधकाम विभागाने दाखवलेले नसल्याने शासनाचा निधी वाया जात आहे.

ही आहे समस्या

बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने तयार केलेली इमारत ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही इमारत म्हणजे भूलभूलैय्या असल्याचा प्रकार आहे. दरवाजा उलट दिशेने तर खोल्या चुकीच्या पद्धतीने बांधल्याने त्याठिकाणी रुग्णांवर इलाज करणे शक्य नसल्याने सांगण्यात आले आहे.

गांभीर्य वाढले

शासनाने रुग्णालयांच्या इमारतींसाठी दिलेल्या निकषातच ही इमारत बसत नसल्याची माहिती आहे. यातून बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची चाैकशी केली नसल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

तब्बल १ कोटी ८० लाख रूपयांचा निधी ह्या इमारतीसाठी मंजूर करण्यात आला होता.

रुग्णालय आरोग्य केंद्रात सुरु : जमाना ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत मिळत नसल्याने सध्या रुग्णालय जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु आहे. या आरोग्य केंद्रात जागा अपुरी पडते आहे. यातून प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांचे हाल होत आहेत.

ठेकेदार म्हणतो इमारत योग्यच..

दरम्यान याबाबत संबधित इमारतीच्या ठेकेदाराला संपर्क केला असता, पाण्याची सोय आहे. इमारतही योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.

गेल्या चार वर्षांपासून पडून असलेल्या या इमारतीची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. यामुळे इमारतीचा निकाल लावण्याची गरज आहे.

जमाना येथे उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत सोयीच नाहीत. पाण्याची सोयही नाही. इमारतीबाबत बांधकाम विभागाला कळवले आहे. सोयी नसल्याने इमारतीचे हस्तांतरण केलेले नाही.

-डाॅ. आर.डी.भोये, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.