शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

किसान ॲपचे वरातीमागून घोडे, वादळ वारे येऊन गेल्यावर अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

नंदुरबार : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ताैक्ते वादळाचा परिणाम जिल्ह्यातही जाणवला होता. यातून जिल्ह्यातील विविध भागात ...

नंदुरबार : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ताैक्ते वादळाचा परिणाम जिल्ह्यातही जाणवला होता. यातून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. यातून शेतकरी वापर असलेले किसान सुविधा ॲप हे पुन्हा एकदा बेभरवशाचे ठरले असल्याचा दावा शेतकरी करत आहेत.

जिल्ह्यात ७५ टक्के हंगामी शेती केली जाते. केवळ खरीप आणि रब्बी पिकांपुरती मर्यादित शेती करून उदरनिर्वाह केला जातो. उर्वरित २५ टक्केे शेतीत बागायती फळ पिके, भाजीपाला यासह इतर प्रयोगात्मक शेती केली जाते. यातून बागायतदार शेतकरी जिल्ह्यात सर्वाधिक जागरुक असल्याचे चित्र आहे. हे शेतकरी तंत्रज्ञानाचाही लाभ घेतात. यातून केंद्र शासनाने विकसित केलेले किसान सुविधा ॲप गेल्या काही काळापूर्वी मार्गदर्शक ठरले होते. परंतु ऐनवेळी माहिती देण्यात हे ॲप मागे पडत असून वारे किंवा वादळ येऊन गेल्यावर अलर्ट येण्याचे प्रकार सुरू आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने हवामानाचा अंदाज घेतात. वर्तमानपत्रे किंवा टीव्हीवर देण्यात येणाऱ्या बातम्यांमधून हवामानाची माहिती घेतात. किसान सुविधा ॲपबाबत अजूनही तेवढी माहिती शेतकऱ्यांना नाही. कृषी विभागाने माहिती दिली पाहिजे. जे ॲप वापरतात त्यांना अडचणी येतात, म्हणून त्यात सुधारणा केल्या पाहिजेत.

-जयसिंग माळी, शेतकरी

मोड, ता. तळोदा.

युवा शेतकरी म्हणून ॲप डाऊनलोड केले आहे. त्याचा वापरही नियमित करतो. यातून काही दिवसांपूर्वी योग्य माहिती मिळत होती. परंतु हवामानाची लेटेस्ट अपडेट मिळत नाही. एकच माहिती सतत रिपिट होते. वादळ येणार आहे एवढेच कळते, पण लोकेशन आणि त्याचा नेमका वेग व नुकसान टाळण्यासाठी काय करावे हे लवकर सांगण्यात येत नसल्याने अडचणी वाढतात.

-दीपक मराठे,

शेतकरी, रांझणी, ता. तळोदा

ही माहिती मिळते

देशातील हवामानाची माहिती मिळते. पाऊस, वादळ, वारे आणि वातावरणातील आर्द्रता याची माहिती मिळते.

शेतमालाचा दैनंदिन भाव, हमीभाव, शासकीय दरपत्रक तसेच व्यापाऱ्यांची माहिती मिळते.

देशभरातील शेती उत्पादन खरेदी विक्रीचा बाजार, शेती पिकांचे संगोपन कसे करावे, याची माहिती ॲपवर देण्यात येते.

स्मार्टफोनचा वापर कमी

नंदुरबार जिल्ह्यात या ॲपचा वापर करणारे शेतकरी पाच टक्केच असल्याचा दावा केला जातो. स्मार्टचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने हा वापर टळतो.

ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क ही गंभीर समस्या आहे. दूरसंचार विभागाचे मोबाइल नेटवर्क चालत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक मेसेजेस हे उशिराने मिळतात. यातून अनेक जण स्मार्टफोन वापर टाळतात.

केंद्र शासनाच्या कृषी विभागाने तयार केलेले ॲप शेतकऱ्यांना सहाय्यकारी असे आहे. यातून शेतकरी माहितीच्या जाळासोबत जोडले जात आहेत. शेतकरी या ॲपचा वापर करत आहेत. ही सुखावह बाब आहे. जसा स्मार्टफोनचा वापर वाढेल तसा ॲपचा वापर वाढेल, जिल्ह्यात वातावरणातील बदलांची माहिती देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतो.

-अनंत पोटे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी