नवापूर शहरी भागातील गल्ली गोळ्यांमध्ये शिक्षक ‘होम टू होम’ जाऊन ४५ वर्षीय लोकांनी लसीकरण करावे, यासाठी नोंदणी करत आहे. लसीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ज्या नागरिकांनी लसीकरण केले आहे, अशांचे नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, संपर्क क्रमांक एका तक्त्यात नोंदी केल्या जात आहे.
नंदूरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने लसीकरणाच्या बाबतीत जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी ग्रामस्थ लसीकरणाला घाबरत असून, सोशल मीडियावर चुकीच्या मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये लसीकरणाने भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण एकमेव उपाय असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, परंतु ग्रामीण भाग असो की, शहरी भाग यातून लसीकरणाला अल्पसा प्रतिसाद दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरण करावे, यासाठी आवाहन करीत आहे. शिक्षकांना ग्रामीण व शहरी भागात पाठवून मतदान यादीतील ४५ वर्षीय नागरिकांचा गट तयार करून सर्वांच्या नोंदी घेत, ‘होम टू होम’ सर्व्हे करण्यासाठी जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सज्ज झाले असून सर्व्हे करीत आहे. कोरोनाचा काळात शिक्षकांचा ‘होम टू होम’ सर्व्हे चांगल्या पद्धतीने केला जात आहे.
कोरोना काळात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने व यंत्रणेवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी शिक्षकांना काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आले आहे.
शिक्षकांकडे नवापूर सीमा नाक्यावर नोंदी करणे, होम टू होम सर्व्हे करणे, पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींना कॉल करून माहिती घेणे, असे काम शिक्षकांकडून केले जात आहे. शाळा जरी बंद असल्या, तरी शिक्षकांची भूमिका कोरोना काळात महत्त्वाची ठरत आहे.