शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरअखेर घरकुल पूर्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केली आहेत. परंतु हप्तेपद्धतीने अनुदान बहुतांश उपलब्ध करुन दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केली आहेत. परंतु हप्तेपद्धतीने अनुदान बहुतांश उपलब्ध करुन दिले असतानाही काही लाभार्थ्यांकडून घराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून शेतीच्या कामांमुळे या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल आवास योजना राविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला देण्याचे शासनामार्फत जाहिर करण्यात आले आहेत. त्यात सहाही तालुक्यांना आवश्यकतेनुसार दरवर्षी उद्दिष्ट देण्यात येते आहे. त्यात २०१६ पासून २०२० या चार वर्षाच्या कालावधीत या योजनेसाठी एकुण ९५ हजार ३९२ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासानामार्फत ७९ हजार १८६ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात सर्वाधिक अक्कलकुवा तालुक्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे.उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांची निवडही करण्यात आली. त्यापैकी बहुतांश लाभार्थ्यांना हप्ता पद्धतीने घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदानही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परंतु काही लाभार्थ्यांकडून अद्याप घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाला आढळून आले आहे. त्यामुळे घरकुल उद्दिष्ट पूर्ण करण्यात नंदुरबार जिल्हा मागे पडऱ्याची शक्यता आहे. उद्दिष्ट पूर्ततेत आघाडी घेण्यासाठी वेळोवेळी बांधकामे पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही बहुतांश घरकुले अपुर्ण असल्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत अपुर्ण बांधकाम असलेल्या लाभार्थ्यांना दि. ३१ डिसेंबरपर्यंत तातडीने घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे लाभार्थ्यांकडून बांधकामाला निश्चितच गती दिली जाईल. शिवाय लाभार्थ्यांना अपेक्षेनुसार हक्काचे घरही उपलब्ध होईल. त्यामुळे केलेले आवाहन लाभार्थ्यांसाठी हिताचेच असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या आवाहनामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.शेती कामांच्या ऐन धावपळीत प्रशासनाने लाभार्थ्यांना पत्र दिल्याने काही लाभार्थ्यांकडून कामाला गती देण्यात आली असले तरी डिसेंबर अखेरपर्यंत कुठल्याही लाभार्थ्यांकडून बाधकाम पूर्ण होणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने पत्राद्वारे केलेल्या आवाहनाबाबत संवेदनशिलतेने विचार करावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.दुर्गम भागातील या योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी रब्बी हंगामातील शेतीकडे वळले आहे. त्यामुळे ते त्या कामातच अधिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतीमुळे ठिकिंठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य घेऊन जाण्यासाठी रस्त्याची सोयच नसल्यामुळे कामात अडथळा येत असल्याचे लाभार्थ्यांकडून म्हटले जात आहे.४घराचे बांधकाम अपूर्ण असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना पत्र देण्यात आले आहे. त्यात डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करºयाचे आवाहन केले आहे. परंतु या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास जिल्हा परिषद प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे यामुळे लाभार्थ्यांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली असून रब्बी हंगाम संपेपर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.४काही लाभार्थ्यांकडून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून हे काम पूर्ण करण्याचे आवाहन केल्यास लाभार्थ्यांना बांधकामासाठी योग्य वेळ देता येईल, असे लाभार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु लाभार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वेळ दिल्यास लाभार्थी अधिक दिरंगाई करतील, अशी भूमिकाही प्रशासनाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.