शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

महामार्गावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून या खड्ड्यांमुळे आता महामार्गावर धावणारी वाहनेदेखील नादुरुस्त होऊ लागले आहेत. यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी फाट्यापर्यंतच्या महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. या मार्गावर दिवस-रात्र जड-अवजड वाहनांची वर्दळ असते. मात्र या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनांचा मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळली जात असल्याने वाहने बिघाड होऊन ती निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे.राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या कुंभारखान फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुजरातमधील राजकोट येथून गोणपाट भरून धुळ्याला घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. १८ बीजी- ७१९१) खड्ड्यात आदळला. यामुळे ट्रकचा पाटा तुटला व ट्रकची बॉडी एका बाजूला सरकली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक उलटू दिला नाही. अशाप्रकारे महामार्गावरील खड्ड्यांमध्ये अवजड वाहतूक करणारी वाहने वाहने आदळली जाऊन त्यांच्यात बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर एक ते दीड फुटाचे जीवघेणे खड्डे तयार झाले असून अनेक ठिकाणी तर रस्त्याचे अस्तित्वच संपले आहे. अशा परिस्थितीत खड्ड्यामध्ये किंवा साईटपट्टी वाट शोधत वाहनधारक तारेवरची कसरत करीत वाहने चालवतात. त्यातच रस्त्यावर प्रचंड धुळीलाही वाहनधारकांना सामोरे जावे लागते. गेल्या सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती असताना प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजण्यात यावे व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व संघटनांनी रास्तारोको व अन्य आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे लेखी आश्वासन संबंधितांना दिले होते. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीचे कोणतेही ठोस काम अद्याप सुरू झालेले नाही. आश्वासन दिल्यानंतर एक आठवडा एका जेसीबीच्या सहाय्याने केवळ रस्त्याच्या साईडपट्ट्या रुंद करण्यात आल्या. परंतु रस्ता दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून करण्यात आलेली नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पहात असून नागरिकांना खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याची भावना व्यक्त होत आहे.