शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

इ चायनावालो व्हायरस हाय, इहाल आमू आदिवासी भागाम आवा न्हा देणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:48 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘इ चायनावालो व्हायरस हाय, इहाल आमू आदिवासी भागाम आवा न्हा देणार...’ ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘इ चायनावालो व्हायरस हाय, इहाल आमू आदिवासी भागाम आवा न्हा देणार...’ हा सूर आहे सातपुड्यातील सर्वात उंच टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलीआंबा, ता.अक्कलकुवा या गावातील महिलांचा. सध्या कोरोनाची भीती जगभर सुरू असताना सातपुड्यातील अतिदुर्गम भागातही या आजारापासून संरक्षणासाठी जनजागृतीचे पडसाद उमटत आहेत.कोरोनाच्या बचावासाठी सरकारतर्फे व प्रशासनातर्फे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवार, २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले असून त्याचीही जागृती सर्वत्र केली जात आहे. सातपुड्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गावांमध्ये देखील या जागृतीचे पडसाद उमटत आहेत. घराबाहेर न पडण्याच्या सरकारच्या आवाहनामुळे या भागातील अनेकांचा रोजगार बुडाला आहे. सातपुड्यातील अनेक कुटुंबांच्या घरात दिवसा काम न केल्यास रात्री चूल पेटत नाही, अशी स्थिती असतानाही कोरोनाच्या मुकाबल्यासाठी या भागातील आदिवासी देखील धीटपणे उभे राहिले आहेत. यासंदर्भात अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गुलीआंबा व त्या परिसरातील चित्र पाहिल्यास या भागातही मोठ्या प्रमाणावर जागृती आल्याची स्थिती आहे.गुलीआंबा हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर असून त्याच्याच पायथ्यात डोंगरदºयात चार पाड्यात विस्तारलेले गाव. येथे एकूण १२१ कुटुंब राहतात. सर्वच कुटुंब याबाबत दक्ष असल्याचे दिसून आले. तेथील मथुराबाई उदेसिंग पाडवी यांनी सांगितले, हा चायनातून आलेला रोग आहे. तो रोग आम्ही घेणार नाही आणि या भागात येऊही देणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी आम्ही घेत आहोत. मयतूबाई मिथुन वसावे यांनी सांगितले, सरकारने व आमच्या कार्यकर्त्यांनी हा आजार टाळण्यासाठी जास्त लोकांमध्ये न जाण्याचे व घरीच थांबण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजार या भागात येऊ नये म्हणून आम्ही सर्व सूचनांचे पालन करू. भले त्यासाठी रोजगार बुडाला तरी चालेल. अशाच प्रतिक्रिया देवकीबाई जोकू पाडवी, मोगराबाई पाडवी यांनी व्यक्त केल्या. एकूणच गुलीआंबा व तेथील केलवाडी, शेल्टामाळ, जयामाळ या पाड्यांमध्येही तसेच लगतच्या सावर, पिंपळगाव, आमली या भागात कोरोनाबाबत लोक जागरुक असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमार्फत त्यासाठी आदिवासी भाषेतील ध्वनीफिती व मोबाईलवरील चित्रफितीद्वारे जनजागृती केली जात असल्याचे चित्र आहे.