शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

बिगर नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही मदत जाहीर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

जिल्ह्यात चार नगरपालिका, एक नगरपंचायत व एक ग्रामपंचायत कार्यरत आहे. सहा तालुक्यांत नोंदणीधारक फेरीवाल्यांची ००० संख्या एवढी असून, त्यापेक्षा ...

जिल्ह्यात चार नगरपालिका, एक नगरपंचायत व एक ग्रामपंचायत कार्यरत आहे. सहा तालुक्यांत नोंदणीधारक फेरीवाल्यांची ००० संख्या एवढी असून, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक संख्या विना नोंदणीधारक फेरीवाल्यांची आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या बचत खात्यावर दीड हजार रुपये अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत होत असले तरी जे दररोज हातगाडीवर व्यवसाय करतात, ज्यांची कुठेच नोंदणी नाही अशांसाठी कुठलीही योजना शासनाने जाहीर केली नसल्याने बिगर नोंदणीकृत फेरीवाल्यांतर्फे आम्हालासुद्धा शासनाने या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

शासनाने या कालावधीत आम्हा फेरीवाल्यांना सकाळी सात ते संध्याकाळी सात असा व्यवसाय करण्याची परवानगी दिल्यास याचा आम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. यासोबतच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र हॉकर्स झोन फेरीवाल्यांसाठी आरोग्य सुरक्षा कवच साधी योजनांचाही लाभ देणे गरजेचे आहे. आम्ही दिवसभर मेहनत करून आमच्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालवीत असल्याने शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष न करता आमच्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केली पाहिजे, असे मत फेरीवाल्यांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पालिकेमार्फत अधिकृत हॉकर्स झोन नसल्याने व्यवसाय करताना रस्त्यावर उभे राहावे लागते. हातगाडी भाड्याने घ्यावी लागते. दिवसभर उन्हातान्हात काम करावे लागते. कधी पोलिसांचा त्रास, तर कधी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचा जाच. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ नाही, वेळप्रसंगी कर्ज काढून व्यवसाय करावा लागतो.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे. भाजीपाला हा नाशवंत प्रकार असल्याने सकाळी खरेदी केलेला माल हा सायंकाळपर्यंत विक्री झाला नाही तर आर्थिक नुकसान होते. शासनाने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे. त्याऐवजी दिवसभर व्यवसायास परवानगी द्यावी.

- शरीफ बागवान, फेरीवाला, शहादा

शहरातील विविध भागात हातगाडीवरून संसारोपयोगी साहित्य विक्री करून रोजीरोटी कमवत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांकडून खरेदीला फारसा उत्साह नाही. अशा परिस्थितीत सायंकाळी घरी गेल्यावर मन निराश होते. शासनाने मदत जाहीर करण्याऐवजी ठोस उपाययोजना करावी.

-विक्रम सोनवणे, फेरीवाला, शहादा

उच्चशिक्षण घेतले, मात्र नोकरीची संधी मिळाली नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून हातगाडीवर भाजीपाला व फळ विक्री करीत आहे. गेल्या महिनाभरापासून संचारबंदीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच अधिकृत नोंदणी नसल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाचा मला कुठलाच फायदा होणार नाही. शासनाने बिगर नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठीही अनुदान जाहीर करावे.

- शशिकांत अहिरे, फेरीवाला, शहादा