शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

नंदुरबारसह परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनेक दिवसांच्या खंडानंतर  नंदुरबार, शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. साधारणत: ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनेक दिवसांच्या खंडानंतर  नंदुरबार, शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. साधारणत: अर्धा ते एक तास चाललेल्या या पावसामुळे नंदुरबारातील अनेक भाग जलमय झाले. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात आणि परिसरात पाणी साचल्याने मंडळ कार्यकत्र्याची एकच धावपळ उडाली. शेतांमध्ये देखील पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले. जिल्ह्यात जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पावसाची संततधार होती. या काळात तीन वेळा अतिवृष्टीची नोंद देखील करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे, लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. पाच तालुक्यांमधील पावसाची सरासरी देखील 100 टक्केपेक्षा अधीक गेली आहे. सर्वत्र समाधानकारक स्थिती आहे. पावसाने गेल्या दोन ते तीन आठवडय़ांपासून विश्रांती घेतल्याने शेती कामांना वेग आला होता. आता परतीच्या पावसाची प्रतिक्षा लागून असतांना बुधवारी रात्री व गुरूवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्री शहादा तालुक्यातील तापी पट्टय़ात मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी आद्रतेत वाढ झाल्याने उकाडय़ाने हैराण केले होते. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: अर्धा ते एक तास मुसळधार पाऊस सुरू होता.गणपती मंडपांमध्ये पाणीनंदुरबारातील अनेक भागातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये पाणी घुसले होते. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची जागा नसल्यामुळे मंडप व परिसरात पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी मंडळ कार्यकत्र्याची कसरत होत होती. काही मंडळांच्या आरास आणि सुशोभिकरणाचे नुकसान झाले. मंडपांचे देखील नुकसान झाले. त्यामुळे काही मंडळांनी गुरुवारी रात्री आरास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतांमध्ये पाणीमुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. यामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. गेल्या दोन ते तीन आठवडय़ात शेतक:यांनी शेतीची मशागत केली होती. काही ठिकाणी मका, मूग, चवळी काढणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. रस्त्यांची पुन्हा दैनागणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. आजच्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांची पुन्हा दैना झाली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकी व तीन चाकी वाहने बंद पडत होती. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते. 

सारंगखेडा  परिसरात बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिके पुन्हा पाण्याखाली आली आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच बुधवारी रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साचल्याने पिकांचे नुकसान होणार असून बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. परिसरातील कु:हावद, कौठळ, बिलाडी, अनरद, पुसनद, सारंगखेडा, टेंभा, देऊर, कळंबू, बामखेडा त.सा. आदी भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.