शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

उष्णतेच्या लाटेने सर्वसामान्य झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:34 IST

तापमान वाढ : नंदुरबारचे तापमान ४३ अंशावर कायम, उकाड्यात झाली वाढ

नंदुरबार : पश्चिम राजस्थान तसेच कच्छ व सौराष्ट्राकडून उष्ण लहरी मोठ्या प्रमाणात लगतच्या परिसरात भेदत असल्याने नंदुरबारात सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़ वाढते तापमान व उकाड्याने नागरिक बेजार झाले आहेत़नंदुरबारात तापमान वाढीचे रोजच नवनवे रेकॉर्ड होत आहेत़ मंगळवारी ४३ अंशावर असलेले कमाल तापमान बुधवारी ४३.३ अंशावर केले़ हवेत आद्रतेचे प्रमाणात तब्बल ४३ टक्के राहिल्याने नागरिक पूर्णपणे घामोघाम होत आहेत़ तापमान वाढ व असह्य उकाड्यामुळे नागरिक बेजार झाले असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान, वाढत्या तापमानाचा सामना करावा तरी कसा असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे़ तापमानाची तीव्रता इतकी आहे की, पंखे, कुलरदेखील निरुपयोगी ठरत असल्याची स्थिती आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातही तापमान वाढीची समस्या जाणवत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिवनावरही याचा परिणाम पडलेला दिसून येत आहे़नंदुरबारसह खान्देशात २६ ते २९ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याचा इशारा आयएमडीतर्फे देण्यात आलेला आहे़ यात, नंदुरबाराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ दरम्यान, वाढत्या तापमानामुळे दुपारी नंदुरबारातील वर्दळीचे रस्तेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहेत़ रात्रीदेखील उष्णतेच्या झळा बसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़ वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे़