शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:21 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आहे़

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची ३१ डिसेंबरला मुदत संपणारनंदुरबार जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांना कर्जमुक्तीनंदुरबार जिल्ह्यात ४७ हजार ५९० लाभार्थी

भूषण रामराजे ।नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आहे़ विशेष म्हणजे योजनेची मुदत संपण्याचा अवधी हा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत असल्याने उर्वरित शेतकºयांचे काय असा प्रश्न आहे़मार्च २०१७ पासून राज्यशासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना आणली होती़ यातंर्गत बँकांकडून घेतलेल्या पीककर्जापैकी दीड लाख रुपये माफ करण्यात आले होते़ यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर करुन दिले होते़ या आॅनलाईन अर्जानंतर शासनाकडून देण्यात येणाºया याद्यांनुसार बँकांकडे थकीत असलेले दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु झाली़ बँकेत दीड लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकºयांच्या याद्यांचा पहिल्या टप्प्यात निपटारा करण्यात आला होता़ सुरुवातीला वेग पकडणारी ही सन्मान योजना गेल्या वर्षभरापासून रडखडत सुरु होती़जिल्ह्यातील ९ राष्ट्रीयकृत बँका, १ खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ हजार १९४ खातेदार शेतकºयांसाठी शासनाकडून १०७ कोटी ११ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यास मंजूरी देण्यात आली होती़ गेल्या वर्षभरात या २७ हजार शेतकºयांपैकी केवळ २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ उर्वरित ३ हजार २७९ शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया ही तांत्रिक अडचणींमुळे रखडली आहे़ येत्या काळात त्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार आहे़परंतू उर्वरित १९ हजार ६७६ अर्जदार शेतकºयांच्या कर्जमाफीबद्दल कारवाई होत नसल्याने त्यांच्या बँकांमध्ये चकरा सुरुच आहेत़ बहुतांश शेतकºयांच्या खात्यावर पैसे आल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू त्यांचे पीककर्ज हे दीड लाखांपेक्षा अधिक आहे़ यंदा दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली आहे़ त्यात बँकेत पैसे भरण्यासाठी पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागणार असल्याने शेतकºयांनी पाठपुरावा सोडून दिला आहे़ येत्या ३१ डिसेंबरपर्यंत या योजनेची अंतिम मुदत असल्याची माहिती आहे़ शासनाकडून त्यास साधारण तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे संकेत आहेत़जिल्हा बँकेचे १५ हजार खातेदारगेल्या वर्षभरात बँक आॅफ बडोदाने ९८४ शेतकºयांना ५ कोटी ५५ लाख, बॅक आॅफ इंडियाने ८९२ शेतकºयांना ६ कोटी ३२ लाख, बँक आॅफ महाराष्ट्राने १ हजार ९७१ शेतकºयांना ११ कोटी ५८ लाख ८६ हजार, सेंट्रल बॅक आॅफ इंडियाने २ हजार ५३२ शेतकºयांना ११ कोटी ३६ लाख, देना बँकेने ११४ शेतकºयांना ५ कोटी ५३ लाख, ग्रामीण बँकेने १६२ शेतकºयांना ६ कोटी ९४ लाख, स्टेट बँकेने १ हजार ५०३ शेतकºयांना १२ कोटी ३८ लाख, युनियन बॅकेकडून ८८ शेतकºयांना ७ कोटी ८१ लाख तर जिल्हा बँकेकडून १५ हजार ६४९ शेतकºयांना ४० कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांचे वितरण केले आहे़

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी