शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

हतनूरचे पाणी प्रकाशात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर धरणातून १५ जुलै रोजी रात्री पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी दुपारी तीन वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : हतनूर धरणातून १५ जुलै रोजी रात्री पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रकाशा बॅरेजमध्ये पोहोचले. मात्र प्रकाशा बॅरेजने आधीच पाणीसाठा कमी केल्यामुळे या पाण्याच्या धोका टळला असून येणारे पाणी सर्व वाहून जात आहे.सविस्तर वृत्त असे की, १५ जुलै रोजी रात्री हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. हे पाणी गुरुवारी सुलवाडे, सारंखेडा व प्रकाशा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता पोहोचण्यास सुरुवात झाली. हे पाणी मुबलक प्रमाणात येत आहे. म्हणून प्रकाशा बॅरेजने आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे येणारे सर्वच पाणी जसेच्या तसे पुढे वाहून जात आहे, अशी माहिती सहायक अभियंता वरूण जाधव यांनी दिली. यापूर्वीच महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. यामध्ये नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा संदेश दिला होता. तसेच जनावरे गुरे यांना नदीकाठावर घेऊन जाऊ नये, अशी सूचना दिली होती. त्यामुळे गुरुवारी येथील तापी नदीकाठावर शांतता दिसून आली. प्रकाशा बॅरेज प्रशासनाने आधीच सतर्क राहून दोन दिवस आधी पाच गेट उघडल्याने शिल्लक पाणीसाठा आधीच वाहून गेला. त्यामुळे येणाºया पाण्यावर नियंत्रण झाले आहे. हे पाणी पुढे पाठविल्यामुळे धोका टाळला आहे. आताच्या स्थितीला सुलवाडे बॅरेजचे आठ गेट दोन मीटरने उघडले आहेत. सारंगखेडा बॅरेजचेही १० गेट पूर्ण उघडले आहेत. म्हणून प्रकाशा बॅरेजनेही आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे आलेला पाणीसाठा आता धोक्याचा राहिला नाही, अशी माहिती अभियंता जाधव व सी.आर. यादव यांनी दिली.