शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

क्वॉरंटाईन सेंटरमधील समस्यांनी केले हैराण, नागरिक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्वारंटाईन केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी नाही, स्वॅब घेणे नाही, केंद्रातील असुविधा यामुळे नंदुरबारातील तिन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : क्वारंटाईन केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी नाही, स्वॅब घेणे नाही, केंद्रातील असुविधा यामुळे नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रात दाखल लोकांमध्ये नाराजी आहे. अगदी कारागृहात कोंडल्यासारखी स्थिती झाली असून कोरोनापासून वाचविण्यासाठी उलट त्यात ढकलण्याचा हा प्रकार असल्याची भावना या लोकांची झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.नंदुरबारात तीन ठिकाणी क्वॉरंटाईन केंद्र आहे. त्यात पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे वसतिगृह, होळ शिवारातील आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह आणि समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह यांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून जवळपास १२५ पेक्षा अधीकजण दाखल करण्यात आले आहेत. परंतु या केंद्रांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याची तक्रार आहे. पॉलिटेक्निक वसतिगृहाच्या केंद्रात तर सर्वाधिक समस्या आहेत. उरलेले अन्न, कचरा, तेथील कर्मचाऱ्यांनी घातलेले पीपीई किट परिसरातच टाकला जात आहे. तेथे मोकाट गुरे चरत असतात. यामुळे प्रादुर्भावची शक्यता आणखी वाढली आहे. याशिवाय या ठिकाणी पाण्याची देखील समस्या आहे.स्रानगृह आणि स्वच्छतागृहातील नळांना पाणी येत नाही. एका ड्रममध्ये पाणी भरून ठेवले जाते. त्यातूनच सर्वजण पाणी घेत असतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका आणखी वाढला आहे. येथे देण्यात येणाºया जेवनाची क्वॉलिटी देखील दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. शुक्रवारी दिल्या गेलेल्या जेवनातील टमाटरमध्ये अळ्या निघाल्याची तक्रार काहींनी केली.गुरुवारी तापी-नर्मदा इमारतीमधील क्वॉरंटाईन लोकांनी विविध मागण्यांसाठी थेट क्वॉरंटाईन केंद्रातील मोकळ्या जागेत येऊन आम्हाला घरी जाऊ द्या अशी मागणी केली. अखेर अधिकाºयांनी समजविल्यानंतर तेथील लोकं शांत झाले.एकुणच क्वॉरंटाईन केंद्रातील लोकांमधील नाराजी वाढत असून तातडीने सुधारणा कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.

क्वॉरंटाईन केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तेथे दाखल असलेल्यांच्या तक्रारींची लागलीच दखल घेतली जात आहे. वैद्यकीय पथक देखील त्या ठिकाणी २४ तास तैणात आहे. जेवनाचा दर्जाही चांगला ठेवला जात आहे. तरीही काही तक्रारी असल्यास त्याची दखल घेऊन त्या सोडविल्या जातील. क्वॉरंटाईन लोकांनी देखील सहकार्य करणे अपेक्षीत आहे.-भाऊसाहेब थोरात,तहसीलदार, नंदुरबार.