शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

गुजरभवालीत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात आला.यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षेनुसार पाऊस झाला असला तरी पाण्यासाठी वणवण टळेल याची शाश्वती देता येत नाही. त्यासाठी पाण्याच्या थेंब न् थेंब वाचविण्याची आवश्यकता आहे. ही काळाची गरज ओळखून व आदिवासी देवमोगरा एज्युकेश न सोसायटीचे चेमरमन राजेंद्रकुमार गावीत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गुजरभवाली येथे विविध उपक्रम राबविण्यात येतआहे. त्यात स्वच्छता अभियान व पाणी अडवा, पाणी जिरवा यासह अन्य उपक्रमांचा समावेश आहे.पाण्यासाठी दाहीदिशा किंवा दुष्काळ परिस्थिती पाहून पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबविला जातो. खरे तर हा उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविला जातो. त्यानुसार के.डी.गावीत विद्यालय गुजरभवालीने शिवण नदीवर हा उपक्रम राबविला. यावेळी मुख्याध्यापक घनश्याम पाडवी, शरद जाधव, रवींद्र पवार, देविदास राजपूत, राकेश पाटील, विजयसिंग वळवी, भानुदास पाटील, सुरेश माळी, हिरालाल पाटील, रवींद्र शिरसाळे, हेमराज कोकणी, सविता पाटील व सोनवणे आदी उपस्थित होते.४ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरण असंतुलन, जंगलतोड, पृथ्वीच्या पोटातील कैक किलोमीटर खोलवर जाणाºया कोळसा व इतर खनिजांच्या खाणी या रूपाने पृथ्वीवर अत्याचार होत आहे. त्यात भर म्हणून आणखीन कूपनलिकांच्या रूपाने डोके वर काढत आहे.प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थासाठी आपापल्या जागेत बोअरिंग विहिरी मारतात. त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. सध्या तर पाचशे फूटांपासून एक हजार फूटापर्यंत बोअरिंग केले जातात. यातून पृथ्वीच्या पोटातून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे.अशा प्रकारामुळे पाण्याची पातळी खाली जाते, तसेच विहिरीतील झरे मार्ग बदलतात, एवढेच नव्हे तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील गारवा कमीकमी होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामान, ऋतू, वातावरण बदलत आहेत.अवेळी पाऊस, गारपीट, थंडी, वादळी वारे, धुळीची वादळे, महापूर यांसारख्या अनियमित गोष्टी सातत्याने घडत आहेत. बोअरिंग विहिरीमुळे विहिरींचे झरे आटत असून पाण्याचे मार्गदेखील बदलतात. पाण्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे, अशा धोक्यांवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.