शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
2
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
3
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
4
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
5
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
6
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
7
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
8
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
9
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
10
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
11
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
12
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
13
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
14
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
15
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
16
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
17
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
18
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
19
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
20
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल

गुजरभवालीत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात आला.यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षेनुसार पाऊस झाला असला तरी पाण्यासाठी वणवण टळेल याची शाश्वती देता येत नाही. त्यासाठी पाण्याच्या थेंब न् थेंब वाचविण्याची आवश्यकता आहे. ही काळाची गरज ओळखून व आदिवासी देवमोगरा एज्युकेश न सोसायटीचे चेमरमन राजेंद्रकुमार गावीत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गुजरभवाली येथे विविध उपक्रम राबविण्यात येतआहे. त्यात स्वच्छता अभियान व पाणी अडवा, पाणी जिरवा यासह अन्य उपक्रमांचा समावेश आहे.पाण्यासाठी दाहीदिशा किंवा दुष्काळ परिस्थिती पाहून पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबविला जातो. खरे तर हा उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविला जातो. त्यानुसार के.डी.गावीत विद्यालय गुजरभवालीने शिवण नदीवर हा उपक्रम राबविला. यावेळी मुख्याध्यापक घनश्याम पाडवी, शरद जाधव, रवींद्र पवार, देविदास राजपूत, राकेश पाटील, विजयसिंग वळवी, भानुदास पाटील, सुरेश माळी, हिरालाल पाटील, रवींद्र शिरसाळे, हेमराज कोकणी, सविता पाटील व सोनवणे आदी उपस्थित होते.४ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरण असंतुलन, जंगलतोड, पृथ्वीच्या पोटातील कैक किलोमीटर खोलवर जाणाºया कोळसा व इतर खनिजांच्या खाणी या रूपाने पृथ्वीवर अत्याचार होत आहे. त्यात भर म्हणून आणखीन कूपनलिकांच्या रूपाने डोके वर काढत आहे.प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थासाठी आपापल्या जागेत बोअरिंग विहिरी मारतात. त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. सध्या तर पाचशे फूटांपासून एक हजार फूटापर्यंत बोअरिंग केले जातात. यातून पृथ्वीच्या पोटातून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे.अशा प्रकारामुळे पाण्याची पातळी खाली जाते, तसेच विहिरीतील झरे मार्ग बदलतात, एवढेच नव्हे तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील गारवा कमीकमी होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामान, ऋतू, वातावरण बदलत आहेत.अवेळी पाऊस, गारपीट, थंडी, वादळी वारे, धुळीची वादळे, महापूर यांसारख्या अनियमित गोष्टी सातत्याने घडत आहेत. बोअरिंग विहिरीमुळे विहिरींचे झरे आटत असून पाण्याचे मार्गदेखील बदलतात. पाण्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे, अशा धोक्यांवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.