शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

१२ वर्षे घरापासून दुरावलेल्या अकोल्याच्या युवकाला गुजरातच्या दातृत्त्वाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

साधारण १२ वर्षांपूर्वी अर्थात २००९ साली बन्सीलाल राजाराम केवट हा युवक शिक्षण सुरू असताना मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून कोणालाही ...

साधारण १२ वर्षांपूर्वी अर्थात २००९ साली बन्सीलाल राजाराम केवट हा युवक शिक्षण सुरू असताना मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. कुटुंबाने त्याचा अनेक राज्यांमध्ये शोध घेतला होता. दरम्यान, अहमदाबाद येथील मंगल मंदिर मानव सेवा परिवार या बेवारस लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला बन्सीलाल केवटे मिळून आले होते. सुमारे एक हजार निराधार बेवारस लोकांना या संस्थेने आजवर घरी सोडले आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा असलेल्या दिनेश लाठिया यांनी बन्सीलाल याची सेवा शुश्रूषा करत त्याची चाैकशी करून गावाची माहिती मिळवली होती. यातून अकोला येथे संपर्क करून केवट कुटुंबीयांचा शोध घेतला होता. तब्बल १२ वर्षे घरातून बेपत्ता असलेल्या मुलाचा ठावठिकाणा मिळाल्याने केवट कुटुंबातील निवडक सदस्य त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते. तेथून परत येत असताना हे सर्व सारंगखेडा येथे थांबले असताना केवट कुटुंबीयांनी लोकमत प्रतिनिधीसोबत संपर्क करत माहिती दिली.

अहमदाबाद येथे संस्थेत दाखल असलेल्या बन्सीलाल यानेही कुटुंबातील सदस्यांना ओळखले होते. खातरजमा म्हणून अकोला पोलिसांनी पत्र दिले होते. यानुसार पुतण्या अनिल राम लखन केवट, प्यारेलाल रामसुख सेट केवट, भाऊ नंदलाल राजाराम केवट, भाचा दीपेश दिनेश केवट, मुकेश राजकुमार केवट हे बन्सीलाल यास घेण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते.

अहमदाबाद येथील मंगल मंदिर मानव सेवा परिवार या संस्थेचे अध्यक्ष म्हणून दिनेश लाठिया हे काम पाहतात. समाजसेवेचे व्रत हाती घेऊन त्यांनी रस्त्यावर फिरणारे निराधार, बेवारस रोगी यांच्यासाठी २००६ पासून ही संस्था सुरू केली. या संस्थेने देशात तब्बल ६३४ जणांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचते केेले आहे. यात महाराष्ट्रातील ६५ लोकांचा समावेश आहे. संस्थाचालक दिनेश लाठिया यांना याबाबत विचारणा केली असता, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सीमेवरदेखील असे अनेक बेवारस निराधार लोक आढळून येतात. त्यांच्यासाठीही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या संस्थेत २६० जण असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.