शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा सिमावर्ती भाग काँग्रेससोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:04 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. या तीनपैकी गेल्यावेळी भाजपकडे असलेली एक जागाही यावेळी काँग्रेसने पुन्हा राखली आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्तीभागात आदिवासी बहुल वस्ती ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. या तीनपैकी गेल्यावेळी भाजपकडे असलेली एक जागाही यावेळी काँग्रेसने पुन्हा राखली आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्तीभागात आदिवासी बहुल वस्ती आहे. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा तर गुजरातमधील नर्मदा, तापी आणि डांग हे जिल्हे सिमावर्ती आहेत. या भागातील आदिवासी हे पुर्वापार काँग्रेस सोबतच राहिले आहेत. देशात मोदी लाट आल्यानंतर त्याचा परिणाम नंदुरबारसह गुजरातमधील काही भागातही जानवत आहे. मात्र हा प्रभाव आता पुन्हा कमी होत असल्याचे चित्र आहे. गुजरात विधानसभा सोबतच झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तीन पालिका निवडणुकीत दोन पालिका काँग्रेसकडे तर एका पालिकेवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. गुजरातमध्ये मात्र सिमावर्ती असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. सिमेलगत असलेल्या गुजरातमधील व्यारा आणि डांग मतदारसंघात यापूर्वीही काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते. आता देखील तेथे काँग्रेसने आपली जागा कायम टिकवली आहे. व्यारा मतदारसंघातून पुनाजीभाई गावीत हे 18 हजार 861 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे अरविंद चौधरी यांचा पराभव केला. तर डांग विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मतांनी का होईना काँग्रेसचे मंगल गावीत हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे विजय पटेल यांचा 768 मतांनी पराभव केला. निझर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपचे आमदार होते. यावेळी मात्र ही जागा काँग्रेसने मिळविली आहे. सुनीलभाई गावीत हे या मतदारसंघातून दहा हजार 345 मतांनी विजयी झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची रणधुमाळी असतांनाही जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपचेही नेते गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यामुळे या भागातील निकालाकडेही सर्वाचे लक्ष लागून होते.