शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

गुजरात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा सिमावर्ती भाग काँग्रेससोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:04 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. या तीनपैकी गेल्यावेळी भाजपकडे असलेली एक जागाही यावेळी काँग्रेसने पुन्हा राखली आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्तीभागात आदिवासी बहुल वस्ती ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. या तीनपैकी गेल्यावेळी भाजपकडे असलेली एक जागाही यावेळी काँग्रेसने पुन्हा राखली आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्तीभागात आदिवासी बहुल वस्ती आहे. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा तर गुजरातमधील नर्मदा, तापी आणि डांग हे जिल्हे सिमावर्ती आहेत. या भागातील आदिवासी हे पुर्वापार काँग्रेस सोबतच राहिले आहेत. देशात मोदी लाट आल्यानंतर त्याचा परिणाम नंदुरबारसह गुजरातमधील काही भागातही जानवत आहे. मात्र हा प्रभाव आता पुन्हा कमी होत असल्याचे चित्र आहे. गुजरात विधानसभा सोबतच झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तीन पालिका निवडणुकीत दोन पालिका काँग्रेसकडे तर एका पालिकेवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. गुजरातमध्ये मात्र सिमावर्ती असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. सिमेलगत असलेल्या गुजरातमधील व्यारा आणि डांग मतदारसंघात यापूर्वीही काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते. आता देखील तेथे काँग्रेसने आपली जागा कायम टिकवली आहे. व्यारा मतदारसंघातून पुनाजीभाई गावीत हे 18 हजार 861 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे अरविंद चौधरी यांचा पराभव केला. तर डांग विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मतांनी का होईना काँग्रेसचे मंगल गावीत हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे विजय पटेल यांचा 768 मतांनी पराभव केला. निझर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपचे आमदार होते. यावेळी मात्र ही जागा काँग्रेसने मिळविली आहे. सुनीलभाई गावीत हे या मतदारसंघातून दहा हजार 345 मतांनी विजयी झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची रणधुमाळी असतांनाही जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपचेही नेते गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यामुळे या भागातील निकालाकडेही सर्वाचे लक्ष लागून होते.