स्वस्तिक इन्फ्रा लॉजिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने झालेल्या या कार्यक्रमास अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सखाराम पाटील, सुरक्षा प्रबंधक पवन मिश्रा, पोलीस निरीक्षक श्रीकांत, एम.पी. रेड्डी, आदित्य राघवराजू, जी.मनोज राजू, प्रबंधक व्यंकट शिव राव, क्वालिटी तज्ज्ञ पलका सासतरी, दीपक देशपांडे, अजय सिंह, विदेश प्रधान प्रबंधक करणाकांत, उपप्रबंधक रवींद्र जगताप, अब्बीना सुब्बाराव, सुरक्षारक्षक रवींद्र जगताप आदी उपस्थित होते.
या वेळी पोलीस निरीक्षक शिंगटे म्हणाले की, रस्त्यांची निर्मिती झाल्याने नागरिकांची सोय होत आहे. मात्र वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आपली व कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेता दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे करावे, असे सांगितले. पवन मिश्रा म्हणाले की, रस्त्यांच्या कामांची गती वाढली आहे. रुंदीकरणामुळे वाहनांना वेळेवर सुरक्षितपणे पोहोचता येणार आहे. यामुळे उद्योग-व्यवसाय, व्यापार यांनाही देखील चालना मिळणार आहे. सूत्रसंचालन रवींद्र जगताप यांनी केले.