शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शहाद्यात वाढणारी गर्दी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन रूग्ण आढळला नाही ही चांगली बाब असली तरीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन रूग्ण आढळला नाही ही चांगली बाब असली तरीही शहरातील काही भागात सकाळी नित्याची होणारी गर्दी ही चिंताजनक आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन मिरासे यांनी दिला आहे.प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलीस, आरोग्य व पालिका प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाने दररोज सकाळी आठ ते १२ असा कालावधी निर्धारित केला आहे तर नवीन बाधित रुग्ण आढळत नसल्याने बफर व कंटेनमेंट झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपले उद्योग-व्यवसाय सुरु केले आहे. मात्र ही शिथीलता आता प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. शहरात नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली असून सहा बाधीत रुग्ण उपचार घेत असताना शहरात कोरोना नाही अशा अविभार्वात नागरिक फिरुन गर्दी करत आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. विनाकारण फिरणाºयांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी व आर्थिक घडामोडींना चालना मिळावी म्हणून प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंसोबत जी सुटी दुकाने आहेत त्यांनाही परवानगी दिली. परंतु याचा अर्थ रोज बाहेर पडून काही ना काही खरेदी करावी किंवा गरज नसताना दुसºयाला सोबत म्हणून बाहेर पडून गर्दीत भर घालावी असा नाही. यातून धोका उद्भवू शकतो किंवा तो वाढू शकतो याबाबत चिंतन करण्यात येऊन गर्दी थांबवण्यासाठी नियोजन करण्यात आले. नागरिकांनी शहरातील गर्दी कमी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून दुचाकीस्वार व अन्य नागरिकांनी बाहेर फिरू नये व प्रशासनाबरोबरच स्वत:च्याही आरोग्याला सहकार्य करावे. अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुखांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते.सध्या लॉकडाऊनमधून काही मोकळीक देऊन सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात बाजार आठ वाजता सुरू होत नाही. १० वाजेपासून दुकानदार व लोकही गर्दी करू लागतात. त्यामुळे १० ते १२ या वेळेतच गर्दी वाढते. ही गर्दी कमी करण्यासाठी वेळेचे पुनर्नियोजन करण्याची गरज आहे.