लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन रूग्ण आढळला नाही ही चांगली बाब असली तरीही शहरातील काही भागात सकाळी नित्याची होणारी गर्दी ही चिंताजनक आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन मिरासे यांनी दिला आहे.प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलीस, आरोग्य व पालिका प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाने दररोज सकाळी आठ ते १२ असा कालावधी निर्धारित केला आहे तर नवीन बाधित रुग्ण आढळत नसल्याने बफर व कंटेनमेंट झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपले उद्योग-व्यवसाय सुरु केले आहे. मात्र ही शिथीलता आता प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. शहरात नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली असून सहा बाधीत रुग्ण उपचार घेत असताना शहरात कोरोना नाही अशा अविभार्वात नागरिक फिरुन गर्दी करत आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. विनाकारण फिरणाºयांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी व आर्थिक घडामोडींना चालना मिळावी म्हणून प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंसोबत जी सुटी दुकाने आहेत त्यांनाही परवानगी दिली. परंतु याचा अर्थ रोज बाहेर पडून काही ना काही खरेदी करावी किंवा गरज नसताना दुसºयाला सोबत म्हणून बाहेर पडून गर्दीत भर घालावी असा नाही. यातून धोका उद्भवू शकतो किंवा तो वाढू शकतो याबाबत चिंतन करण्यात येऊन गर्दी थांबवण्यासाठी नियोजन करण्यात आले. नागरिकांनी शहरातील गर्दी कमी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून दुचाकीस्वार व अन्य नागरिकांनी बाहेर फिरू नये व प्रशासनाबरोबरच स्वत:च्याही आरोग्याला सहकार्य करावे. अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुखांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते.सध्या लॉकडाऊनमधून काही मोकळीक देऊन सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात बाजार आठ वाजता सुरू होत नाही. १० वाजेपासून दुकानदार व लोकही गर्दी करू लागतात. त्यामुळे १० ते १२ या वेळेतच गर्दी वाढते. ही गर्दी कमी करण्यासाठी वेळेचे पुनर्नियोजन करण्याची गरज आहे.
शहाद्यात वाढणारी गर्दी चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:32 IST