शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

गटविकास अधिका:यांना घेराव

By admin | Updated: March 7, 2017 00:22 IST

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांमध्ये पाणीटंचाई : 15 दिवसात करणार उपाययोजना

शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या सात पाडय़ांवरील पाणीटंचाई दूर करण्यात यावी याबाबत निवेदन देऊनही पंचायत समितीमार्फत कुठलीही ठोस उपाययोजना होत नसल्याने सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यानी घेराव आंदोलन केले. दरम्यान, 15 दिवसात पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.कन्साई, ता.शहादा ग्रामपंचायतअंतर्गत डेमच्यापाडा येथे 75 कुटुंबे वास्तव्यास असून पाण्यासाठी केवळ एक हातपंप आहे. तोही नादुरुस्त आहे. परिणामी ग्रामस्थांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. मेंढय़ावळ येथे 25 कुटुंबे वास्तव्यास असून या पाडय़ावरील एकमेव हातपंप वनविकास महामंडळाच्या अधिका:यांनी बंद केला असल्याने ग्रामस्थांना रतनपूर येथून पाणी आणावे लागत आहे. केवडीपाणी येथे 90 कुटुंबे वास्तव्यास आहेत. पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने ग्रामस्थ नदीच्या पाण्याचा वापर करतात. या दूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. धजापाणी येथे 40 कुटुंबे असून विहिरीतील पाणी पुरेसे नाही. अंबापाणी येथे 80 कुटुंबे असून विहिरीच्या पाण्यावरच त्यांना अवलंबून रहावे लागत आहे. सातपिंप्री येथे 30, तर मिठापूर येथे 35 कुटुंबे असून दोन्ही पाडय़ांवर प्रत्येकी एक हातपंप आहे. मात्र ते नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे सातही पाडे 100 टक्के आदिवासीबहुल असून येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे डिसेंबर 2015 व 30 जानेवारी 2017 रोजी लेखी निवेदनाद्वारे करून पाणीटंचाई दूर झाली नाही तर शहादा तहसील कार्यालय अथवा पंचायत           समिती कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला  होता.या निवेदनाची दखल जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतली नसल्याने मंगळवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायस्वाल यांच्यासह कार्यकत्र्यानी 11 वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. दिवसभर आंदोलन सुरू होते. जोर्पयत मागणी पूर्ण होत नाही तोर्पयत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी कार्यकत्र्यानी केला.पंचायत समितीचे सभापती दरबारसिंग पवार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एल.ए. बोरदे, एम.पी. बिबळे, ओ.एच. गिरासे, प्रशासन अधिकारी पी.आर. वळवी, हरी लिमजी पाटील यांनी पदाधिका:यांशी चर्चा केली. त्यात या पाडय़ांच्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत जिल्हा परिषदेच्या सव्रेक्षण विभागाकडून नवीन विंधन विहिरी घेण्याबाबत मंजूर कृती आराखडय़ात विषयाचा समावेश करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रपत्र ब भरून मंजुरीसाठी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तत्काळ मंजुरीस पाठविण्यात येऊन या पाडय़ांची पाणीटंचाई येत्या 15 दिवसात दूर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. या वेळी फत्तेसिंग भिल, ग्रा.पं. सदस्य संभीबाई भिल, ज्योतीबाई तडवी, राज्या भिल, दारासिंग भिल, दिलीप पवार, किरण खर्डे, गण्या पटले, सामसिंग पाडवी, कुवरसिंग वळवी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.दरम्यान, गटविकास अधिकारी कागणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.