शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्रकल्प बाधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रहातून शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी ...

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जीवन नगर, नर्मदा आशिष नगर, गंगा नगर, मोड, न्यूबन, गोपाळपूर, रोझवा, रेवा नगर व नर्मदा नगर अशी मोटारसायकल यात्रा काढण्यात आली होती.

या वेळी विस्थापितांनी आपल्या पुनर्वसन वसाहतीमधून एकमूठ माती घेवून केंद्र शासनाच्या अन्याय कारक शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत यातून जमीन वाचविण्याचा संकल्प केला. केंद्र सरकारने जे तीन शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार या सर्वांची रोजीरोटी प्रभावित होणार आहे. या कायद्यामुळे आमची खेती, आमची माती मोठ मोठ्या उद्योगपतीच्या ताब्यात जाणार आहे. म्हणून तिला वाचवण्यासाठी ३० मार्चला दांडी येथून निघणाऱ्या मिट्टी सत्याग्रह यात्रेत सहभागी होणार व ही यात्रा ६ एप्रिलला दिल्ली येथे पोहोचणार आहे.

या यात्रेसोबत आमची नर्मदा घाटीची मातीही पोहोचणार आहे. देशभरातून वेगवेगळ्या संघटना आपापल्या क्षेत्राची माती घेवून पोहोचणार असून, या मातीने किसान आंदोलनात आतापर्यंत शहिद झालेल्या शेतकऱ्यांचे शहीद स्मारक बनविले जाणार आहे. व जो पर्यंत केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करीत नाही तो पर्यंत आम्ही शेतकरी आंदोलनासोबत असणार आहे. या मिट्टी सत्याग्रहात नर्मदा नगरचे सरपंच पुण्या वसावे, रेवा नगरचे सरपंच हिरालाल पावरा, पोलीस पाटील जोरदार पावरा, कृष्णा पावरा, कांतीलाल पावरा, लालसिंग वसावे, छगन पावरा, ओरसिंग पटले, खेमसिंग पावरा, रंजना पावरा, आशा वसावे, चेतन साळवे यासह अनेक मिट्टी सत्याग्रहींनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला.

नर्मदा घटीची माती दिल्लीला पोहचणार

तळोदा व शहादा येथील विस्थापितांची मिट्टी सत्याग्रह यात्रा ६ एपरील रोजी दांडी येथे पोहचणार आहे. तेथील मिट्टी सत्याग्रह बरोबर ही यात्रा निघून दिल्ली येथे पोहचणार आहे. तळोदा तालुक्यातून विस्थापितांच्या वसाहतीत निघालेल्या या मोटार सायकल रॅलीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या अन्यायी तीन कायद्यान विरोधात जोरदार घोषणा दिल्या होत्या.