शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

प्रकल्प बाधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रहातून शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी ...

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जीवन नगर, नर्मदा आशिष नगर, गंगा नगर, मोड, न्यूबन, गोपाळपूर, रोझवा, रेवा नगर व नर्मदा नगर अशी मोटारसायकल यात्रा काढण्यात आली होती.

या वेळी विस्थापितांनी आपल्या पुनर्वसन वसाहतीमधून एकमूठ माती घेवून केंद्र शासनाच्या अन्याय कारक शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत यातून जमीन वाचविण्याचा संकल्प केला. केंद्र सरकारने जे तीन शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार या सर्वांची रोजीरोटी प्रभावित होणार आहे. या कायद्यामुळे आमची खेती, आमची माती मोठ मोठ्या उद्योगपतीच्या ताब्यात जाणार आहे. म्हणून तिला वाचवण्यासाठी ३० मार्चला दांडी येथून निघणाऱ्या मिट्टी सत्याग्रह यात्रेत सहभागी होणार व ही यात्रा ६ एप्रिलला दिल्ली येथे पोहोचणार आहे.

या यात्रेसोबत आमची नर्मदा घाटीची मातीही पोहोचणार आहे. देशभरातून वेगवेगळ्या संघटना आपापल्या क्षेत्राची माती घेवून पोहोचणार असून, या मातीने किसान आंदोलनात आतापर्यंत शहिद झालेल्या शेतकऱ्यांचे शहीद स्मारक बनविले जाणार आहे. व जो पर्यंत केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करीत नाही तो पर्यंत आम्ही शेतकरी आंदोलनासोबत असणार आहे. या मिट्टी सत्याग्रहात नर्मदा नगरचे सरपंच पुण्या वसावे, रेवा नगरचे सरपंच हिरालाल पावरा, पोलीस पाटील जोरदार पावरा, कृष्णा पावरा, कांतीलाल पावरा, लालसिंग वसावे, छगन पावरा, ओरसिंग पटले, खेमसिंग पावरा, रंजना पावरा, आशा वसावे, चेतन साळवे यासह अनेक मिट्टी सत्याग्रहींनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला.

नर्मदा घटीची माती दिल्लीला पोहचणार

तळोदा व शहादा येथील विस्थापितांची मिट्टी सत्याग्रह यात्रा ६ एपरील रोजी दांडी येथे पोहचणार आहे. तेथील मिट्टी सत्याग्रह बरोबर ही यात्रा निघून दिल्ली येथे पोहचणार आहे. तळोदा तालुक्यातून विस्थापितांच्या वसाहतीत निघालेल्या या मोटार सायकल रॅलीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या अन्यायी तीन कायद्यान विरोधात जोरदार घोषणा दिल्या होत्या.