शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प बाधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रहातून शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी ...

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जीवन नगर, नर्मदा आशिष नगर, गंगा नगर, मोड, न्यूबन, गोपाळपूर, रोझवा, रेवा नगर व नर्मदा नगर अशी मोटारसायकल यात्रा काढण्यात आली होती.

या वेळी विस्थापितांनी आपल्या पुनर्वसन वसाहतीमधून एकमूठ माती घेवून केंद्र शासनाच्या अन्याय कारक शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत यातून जमीन वाचविण्याचा संकल्प केला. केंद्र सरकारने जे तीन शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार या सर्वांची रोजीरोटी प्रभावित होणार आहे. या कायद्यामुळे आमची खेती, आमची माती मोठ मोठ्या उद्योगपतीच्या ताब्यात जाणार आहे. म्हणून तिला वाचवण्यासाठी ३० मार्चला दांडी येथून निघणाऱ्या मिट्टी सत्याग्रह यात्रेत सहभागी होणार व ही यात्रा ६ एप्रिलला दिल्ली येथे पोहोचणार आहे.

या यात्रेसोबत आमची नर्मदा घाटीची मातीही पोहोचणार आहे. देशभरातून वेगवेगळ्या संघटना आपापल्या क्षेत्राची माती घेवून पोहोचणार असून, या मातीने किसान आंदोलनात आतापर्यंत शहिद झालेल्या शेतकऱ्यांचे शहीद स्मारक बनविले जाणार आहे. व जो पर्यंत केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करीत नाही तो पर्यंत आम्ही शेतकरी आंदोलनासोबत असणार आहे. या मिट्टी सत्याग्रहात नर्मदा नगरचे सरपंच पुण्या वसावे, रेवा नगरचे सरपंच हिरालाल पावरा, पोलीस पाटील जोरदार पावरा, कृष्णा पावरा, कांतीलाल पावरा, लालसिंग वसावे, छगन पावरा, ओरसिंग पटले, खेमसिंग पावरा, रंजना पावरा, आशा वसावे, चेतन साळवे यासह अनेक मिट्टी सत्याग्रहींनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला.

नर्मदा घटीची माती दिल्लीला पोहचणार

तळोदा व शहादा येथील विस्थापितांची मिट्टी सत्याग्रह यात्रा ६ एपरील रोजी दांडी येथे पोहचणार आहे. तेथील मिट्टी सत्याग्रह बरोबर ही यात्रा निघून दिल्ली येथे पोहचणार आहे. तळोदा तालुक्यातून विस्थापितांच्या वसाहतीत निघालेल्या या मोटार सायकल रॅलीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या अन्यायी तीन कायद्यान विरोधात जोरदार घोषणा दिल्या होत्या.