शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

घरोघरी लागेल शिक्षणाचा दिवा ग्रामपंचायत सदस्यही सातवी पास हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:16 IST

हितेश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा :  वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त करुन राजकारण करत दिवस ढकलणा-या अंगठेबहादूर सदस्य व ...

हितेश पाटीललोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा :  वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त करुन राजकारण करत दिवस ढकलणा-या अंगठेबहादूर सदस्य व सरपंचांना शासनाने दणका दिला आहे. सुरु झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत निवडणूक लढवण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक असल्याची अट समाविष्ट करण्यात आली असल्याने अनेक इच्छुकांच्या तयारीला ब्रेक लागला आहे.                जिल्ह्यात ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून गावगाड्याचे राजकारण कमालीचे वेग पकडत आहे. दर दिवशी शेतीकामे सोडून चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरू आहे.  यातच निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर उमेदवार किमान सातवी पास हवा अशी नवीन अधिसूचना आल्याने पॅनलप्रमुख बुचकळ्यात पडले आहेत. विविध प्रभागात उभे करण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांपैकी एखाद-दुसराच शिक्षित आहे. यातून किमान शिक्षित असलेल्या सर्वांचे शिक्षण तपासण्याची वेळ पॅनलप्रमुखांवर येवून ठेपल्याने राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.  या निर्णयामुळे गावोगावी शिक्षणाला महत्त्व येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ऐन निवडणूक सुरु झाल्यानंतर आणि मुदत संपण्याची वेळही जवळ आल्याने यावर मार्ग काढण्यासाठी पुन्हा बैठका सुरू होणार असल्याचे चित्र शहादा ताुलक्यात दिसून आले आहे.  थेट जनतेतून सरपंच निवडीचा २०१७ चा आदेश रद्द करत शासनाने सुधारणा करून सदस्यांमधून सरपंच निवडून आणण्याची अधिसूचना लागू केली आहे. यातून  जुलै २०१७ च्या आदेशात सरपंचऐवजी सदस्य असा शब्द बदलून देण्यात आला आहे. या निर्णयाची प्रत मिळवण्यासाठीही अनेक जण सीएससी सेंटरला भेटी देत आहेत. 

   हे आहेत नवीन नियम जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या उमेदवाराचे शिक्षण 7 वी उत्तीर्ण असणे आवश्‍यक. निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून पासबुक, अनामत रक्कम भरल्याची पावती.

१२ सप्टेंबर २००१ नंतर अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र, शाैचालय वापराचे प्रमाणपत्र, पाणीपट्टी, घरपट्टी आदी थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 

   ग्रामीण भाग            उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत पूर्ण झालेले वय, सरपंच म्हणून निवडून येण्यास अपात्र नाही, ग्राम पंचायतचा ठेकेदार नाही, देय असलेली कोणतीही रकमेची थकबाकी शिल्लक ठेवलेली नसल्याचे घोषणापत्र द्यावे लागणार आहे. सोबत पत्नी व स्वत:च्या व्यवसायाबाबत तपशीलही द्यावा लागणार आहे, आदी कागदपत्रे द्यावे लागणार असल्याचे नवीन शासनाने कळवले आहे. 

आरक्षण नसल्याने रस्सीखेच 

दरम्यान निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. निवडणूकांनंतर सरपंच आरक्षण काढले जाणार असल्याने रस्सीखेच रंगणार आहे.