शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील गोंधळामुळे शासनाचा निधीही पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

अक्कलकुवा ग्रामपंचायतीला राज्यशासनाकडून देण्यात आलेल्या ५० लाख रूपयांच्या स्वनियोजित निधीतून भूमीगत गटारी व इतर कामे करण्याचे आदेश देण्यात आले ...

अक्कलकुवा ग्रामपंचायतीला राज्यशासनाकडून देण्यात आलेल्या ५० लाख रूपयांच्या स्वनियोजित निधीतून भूमीगत गटारी व इतर कामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. २०१८-१९ या वर्षात या भगवा चाैक, हनुमान मंदिर चाैक, श्रीराम चाैक, झेंडा चौक या भागात ही भूमिगत गटारींची कामे होणार होती. यासाठी पंचायत समिती बांधकाम विभागाने काम घेत ठेकेदार नियुक्त केला होता. परंतू ग्रामपंचायतीने गटारींच्या कामात अडथळा येत असल्याचे लेखी देवून हे काम गावातील श्रीराम कॉलनीत एकाच ठिकाणी करण्याचे सूचित केले होते. यात पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या बेबनाव झाल्याची माहिती आहे. चार ठिकाणी मंजूरी दिलेल्या गटारींचे काम एकाच ठिकाणी मंजूर करण्याच्या निर्णयामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही ग्रामपंचायतीकडून एकाच ठिकाणी गटारी तयार करुन घेण्यात आल्या आहेत. यातून सादर झालेले बिल हे त्याच कामाचा भाग आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेत बोगस बिल काढून फसवणूक होत असल्याचे पत्र दिल्याने खळबळ उडाली होती. हे पत्र देणा-या ग्रामसेविकेकडून ग्रामविकास विभागाने चार्ज काढून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. असे असले तरी श्रीराम कॉलनीत राज्य शासनाची परवानगी घेत केलेल्या नियमबाह्य कामाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीकडून दबाव येत असताना संबधित अधिका-यांनी जिल्हा परिषदेला सूचित करणे आवश्यक असतानाही तशी सूचना न करता चार ठिकाणी होणा-या गटारींचे काम एकाच ठिकाणी करुन निधी खर्च करण्याचा प्रकार दाखवला गेल्याने ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात नेमका बेबनाव कशावरुन हे मात्र उलगडलेले नाही. विशेष बाब म्हणजे ५०लाखांच्या निधीतून केवळ एकच काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित निधीतील कामे ग्रामपंचायतीकडून अद्याप सूचितही करण्यात आलेली नाहीत. २०१८-१९ पासून हा निधी ग्रामपंचायतीसाठी राखीव आहे.

याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांना संपर्क केला असता, या प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन दिवसात देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायत सरपंच राजेश्वरी वळवी यांना संपर्क केला असता होवू शकला नाही. जिल्हा परिषदेत पत्र देणा-या ग्रामसेविकेकडून पदभार काढून घेण्यात आल्याने याठिकाणी ग्रामविकास अधिकारी दोन दिवसात नियुक्त करण्यात येणार आहे. यानंतरही या प्रकरणाचा गुंता सूटून अक्कलकुवा शहरात विकासकामे होणार की ग्रामपंचायतीकडून केवळ खर्चिक निधी दाखवला जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.