शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील गोंधळामुळे शासनाचा निधीही पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

अक्कलकुवा ग्रामपंचायतीला राज्यशासनाकडून देण्यात आलेल्या ५० लाख रूपयांच्या स्वनियोजित निधीतून भूमीगत गटारी व इतर कामे करण्याचे आदेश देण्यात आले ...

अक्कलकुवा ग्रामपंचायतीला राज्यशासनाकडून देण्यात आलेल्या ५० लाख रूपयांच्या स्वनियोजित निधीतून भूमीगत गटारी व इतर कामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. २०१८-१९ या वर्षात या भगवा चाैक, हनुमान मंदिर चाैक, श्रीराम चाैक, झेंडा चौक या भागात ही भूमिगत गटारींची कामे होणार होती. यासाठी पंचायत समिती बांधकाम विभागाने काम घेत ठेकेदार नियुक्त केला होता. परंतू ग्रामपंचायतीने गटारींच्या कामात अडथळा येत असल्याचे लेखी देवून हे काम गावातील श्रीराम कॉलनीत एकाच ठिकाणी करण्याचे सूचित केले होते. यात पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या बेबनाव झाल्याची माहिती आहे. चार ठिकाणी मंजूरी दिलेल्या गटारींचे काम एकाच ठिकाणी मंजूर करण्याच्या निर्णयामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही ग्रामपंचायतीकडून एकाच ठिकाणी गटारी तयार करुन घेण्यात आल्या आहेत. यातून सादर झालेले बिल हे त्याच कामाचा भाग आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेत बोगस बिल काढून फसवणूक होत असल्याचे पत्र दिल्याने खळबळ उडाली होती. हे पत्र देणा-या ग्रामसेविकेकडून ग्रामविकास विभागाने चार्ज काढून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. असे असले तरी श्रीराम कॉलनीत राज्य शासनाची परवानगी घेत केलेल्या नियमबाह्य कामाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीकडून दबाव येत असताना संबधित अधिका-यांनी जिल्हा परिषदेला सूचित करणे आवश्यक असतानाही तशी सूचना न करता चार ठिकाणी होणा-या गटारींचे काम एकाच ठिकाणी करुन निधी खर्च करण्याचा प्रकार दाखवला गेल्याने ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात नेमका बेबनाव कशावरुन हे मात्र उलगडलेले नाही. विशेष बाब म्हणजे ५०लाखांच्या निधीतून केवळ एकच काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित निधीतील कामे ग्रामपंचायतीकडून अद्याप सूचितही करण्यात आलेली नाहीत. २०१८-१९ पासून हा निधी ग्रामपंचायतीसाठी राखीव आहे.

याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांना संपर्क केला असता, या प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन दिवसात देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायत सरपंच राजेश्वरी वळवी यांना संपर्क केला असता होवू शकला नाही. जिल्हा परिषदेत पत्र देणा-या ग्रामसेविकेकडून पदभार काढून घेण्यात आल्याने याठिकाणी ग्रामविकास अधिकारी दोन दिवसात नियुक्त करण्यात येणार आहे. यानंतरही या प्रकरणाचा गुंता सूटून अक्कलकुवा शहरात विकासकामे होणार की ग्रामपंचायतीकडून केवळ खर्चिक निधी दाखवला जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.