शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

होऊन जाऊद्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. यामुळे नवजीवनाला प्रारंभ करण्यासाठी उत्सुक असलेल्या विवाहेच्छुकांना ...

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. यामुळे नवजीवनाला प्रारंभ करण्यासाठी उत्सुक असलेल्या विवाहेच्छुकांना निर्बंधानंतरच्या नव्या मुहूर्तांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाने लागू केलेल्या नवीन निर्बंधांमुळे अनेकांना विवाह रद्द करावे लागले होते. यातून काहींनी साधेपणाने विवाह उरकून घेत वेळ मारून नेली आहे. दरम्यान, येत्या काळातही निर्बंध कायम राहण्याची शक्यता असल्याने विवाहेच्छुक नियोजनात्मक विवाहांच्या तयारीला लागले आहेत.

शुभ मुहूर्त

जुलैमध्ये १, २, ३, १३, २२, २५, २६, २८ व २९ असे विवाह मुहूर्त आहेत. आता यातील पहिले तीन मुहूर्त आधीच गेल्याने आता केवळ सहा मुहूर्त शिल्लक राहिले आहेत. नवीन निर्बंध लागल्याने विवाहेच्छुकांच्या उत्साहाला ब्रेक लागला असला तरीही ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करायचे ठरल्यास निर्बंध पाळूनच विवाह उरकावा असे नियोजन कुटुंबीय स्वीकारत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध मध्यंतरी शिथिल करून विवाह सोहळ्यासाठी १०० जणांना परवानगी देण्यात आली होती; परंतु नवीन आदेशानुसार ५० जणांनाच विवाहाला येण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच सर्वांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे.

लग्न म्हटले की मंगलकार्यालय, आचारी, बँडबाजा, घोडा, वाहने आदींचे अगोदरच बुकिंग करावे लागते, तसेच लग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, फर्निचर, दागदागिने यासह रुखवत आदी वस्तू लग्न मुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदरच खरेदी कराव्या लागतात. मात्र, लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे लग्न सोहळे यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्यांचे वार्षिक आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. अनेकांनी वाजंत्री, हाॅल, आचारी यांचे बुकिंग रद्द केले आहे.

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे. विवाह सोहळ्यातील उत्साहासोबतच भान जपले पाहिजे. रुढी व परंपरा यांचे पालन समाजात होतेच; परंतु आरोग्य हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्याचाही विचार करायला हवा. कमीत कमी लोकांना आमंत्रित करून विवाह सोहळे आयोजित करणे चांगलेच.

कोरोनाकाळातील निर्बंध पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये होणारे लग्न सोहळे चांगली संकल्पना आहे. यामुळे अनावश्यक खर्च टाळणे शक्य आहे. त्यामुळे समाजात हा पायंडा पडल्यास वधूपित्याचा बराच खर्च वाचणार आहे.

-कोमलसिंग राजपूत

-रमेश पाटील