शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल व कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:02 IST

तळोदा तालुका : दुष्काळसदृश परिस्थिती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

तळोदा : परतीच्या पावसानेही तालुक्यात पाठ फिरविल्यामुळे सोयाबीन पिकाबरोबरच इतर पिकेही पूर्णत: वाया गेली आहेत. त्यामुळे कर्ज वसुलीबरोबरच वीज बील व शासकीय वसुलीस स्थगिती देवून संपूर्ण तळोदा तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.याप्रकरणी संघटनेच्या पदाधिका:यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यात यंदा अतिशय कमी पाऊस झाला आहे. अगदी सरासरीच्याही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस, मूग, उडीद, बाजरी या खरीप पिकांची स्थिती अतिशय नाजूक होवून पिकेही वाया गेली आहेत. त्यामुळे शेतक:यांनी पिकांसाठी लावलेला खर्चदेखील निघणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. शेतक:यांवर कजर्बाजारी होण्याची वेळ आल्यामुळे तो अक्षरश: हतबल झाला आहे. यंदाच्या अत्यंत कमी पावसामुळे धरणे, नदी, नालेदेखील वाहून निघाले नाहीत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही प्रचंड खालावणार आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या आशासुद्धा मावळल्या आहेत. तळोदा तालुक्यातील पजर्न्यमानाची ही वस्तुस्थिती लक्षात घेवून यंदा संपूर्ण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा. याशिवाय हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पावसाअभावी पूर्णपणे नष्ट झाल्याने या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे आपल्या कर्मचा:यांमार्फत तातडीने करून शेतक:यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. त्याचबरोबर शेतक:यांवरील विविध बँकांची कजर्वसुली, विजेचे बील व इतर शासकीय देणीस यंदा स्थगिती देवून शासनाने गेल्यावर्षाच्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शेतक:यांना मिळणारे अनुदान शेतक:यांच्या त्वरित द्यावे. कर्ज खात्यात हे अनुदान कपात करू नये, अशी सक्त ताकीद संबंधीत बँक प्रशासनास देण्यात यावी. पावसाची बिकट स्थिती पाहून शेतक:यांची अंतिम पीक पैसेवारी 50 पैशाच्या आत लावावी आदी मागण्या संघटनेचे तळोदा तालुकाध्यक्ष संतोष माळी, जयसिंग माळी, शानूबाई वळवी, प्रशांत मगरे, महेश राजकुळे, किरण सूर्यवंशी, दीपक चौधरी, दीपक राजाराम देवरे, नंदलालपुरी शंकरपुरी गोसावी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, तहसीलदार चंद्रे यांनी शेतक:यांचे निवेदन स्विकारून आपल्या मागण्यांबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन शेतक:यांना दिले.