शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल व कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:02 IST

तळोदा तालुका : दुष्काळसदृश परिस्थिती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

तळोदा : परतीच्या पावसानेही तालुक्यात पाठ फिरविल्यामुळे सोयाबीन पिकाबरोबरच इतर पिकेही पूर्णत: वाया गेली आहेत. त्यामुळे कर्ज वसुलीबरोबरच वीज बील व शासकीय वसुलीस स्थगिती देवून संपूर्ण तळोदा तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.याप्रकरणी संघटनेच्या पदाधिका:यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यात यंदा अतिशय कमी पाऊस झाला आहे. अगदी सरासरीच्याही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस, मूग, उडीद, बाजरी या खरीप पिकांची स्थिती अतिशय नाजूक होवून पिकेही वाया गेली आहेत. त्यामुळे शेतक:यांनी पिकांसाठी लावलेला खर्चदेखील निघणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. शेतक:यांवर कजर्बाजारी होण्याची वेळ आल्यामुळे तो अक्षरश: हतबल झाला आहे. यंदाच्या अत्यंत कमी पावसामुळे धरणे, नदी, नालेदेखील वाहून निघाले नाहीत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही प्रचंड खालावणार आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या आशासुद्धा मावळल्या आहेत. तळोदा तालुक्यातील पजर्न्यमानाची ही वस्तुस्थिती लक्षात घेवून यंदा संपूर्ण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा. याशिवाय हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पावसाअभावी पूर्णपणे नष्ट झाल्याने या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे आपल्या कर्मचा:यांमार्फत तातडीने करून शेतक:यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. त्याचबरोबर शेतक:यांवरील विविध बँकांची कजर्वसुली, विजेचे बील व इतर शासकीय देणीस यंदा स्थगिती देवून शासनाने गेल्यावर्षाच्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शेतक:यांना मिळणारे अनुदान शेतक:यांच्या त्वरित द्यावे. कर्ज खात्यात हे अनुदान कपात करू नये, अशी सक्त ताकीद संबंधीत बँक प्रशासनास देण्यात यावी. पावसाची बिकट स्थिती पाहून शेतक:यांची अंतिम पीक पैसेवारी 50 पैशाच्या आत लावावी आदी मागण्या संघटनेचे तळोदा तालुकाध्यक्ष संतोष माळी, जयसिंग माळी, शानूबाई वळवी, प्रशांत मगरे, महेश राजकुळे, किरण सूर्यवंशी, दीपक चौधरी, दीपक राजाराम देवरे, नंदलालपुरी शंकरपुरी गोसावी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, तहसीलदार चंद्रे यांनी शेतक:यांचे निवेदन स्विकारून आपल्या मागण्यांबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन शेतक:यांना दिले.