लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. आवास योजनेच्या लाभाथ्र्यांना येणा:या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सातपुड्याच्या डोंगरद:यात थेट लाभाथ्र्यांपयर्ंत जाऊन काम करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सोमवंशी यांनी प्रत्यक्ष खेडोपाडी भेटी देऊन लक्ष केंद्रित केले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतून नंदुरबार जिल्ह्यातील 40,612 लाभाथ्र्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. यापैकी 33, 423 लाभाथ्र्यांचे जिओ टॅगिंग करून मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 9,341 लाभाथ्र्यांना पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. आता निर्धारित करण्यात आलेल्या लाभाथ्र्यांपैकी 32,004 लाभाथ्र्यांचे बँक खाते पडताळणी करण्यात आले आहेत. प्रपत्र ब मधील प्रत्येक पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रय}शील आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने मागील आठवड्यात 3 जुलै रोजी ‘आवास दिन’ साजरा करून प्रत्येक लाभाथ्र्यापयर्ंत पोहोचण्याचा प्रय} केला. त्याअंतर्गत प्रशासनातील वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिका:यांनी संपूर्ण जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर आहे. परंतु ज्यांना घराचे बांधकाम सुरु करणे शक्य झाले नाही, किंवा ज्यांनी घराचे बांधकाम सुरु केले परंतु पुढील काम करण्यास अडचण येत आहे, अशा सर्व लाभाथ्र्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्या अडचणी जागेवरच सोडविणे शक्य होते, त्या अडचणी लागलीच सोडविण्यात आल्या होत्या.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे स्वत: माहिती घेत आहेत. ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संदीप माळोदे यांनी याप्रकरणी संपूर्ण नियोजन करून तालुकास्तरीय यंत्रणा गतिमान केली. त्याअंतर्गतच 20 व 21 जुलै हे दोन दिवस तर जिल्हा परिषद प्रशासनाने या मोहिमेला अधिक गतिमान केले. सुटीच्या दिवशी या अधिका:यांनी घरकुल योजनेच्या लाभाथ्र्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रय} केला. मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी ही योजना प्रत्येक पात्र लाभाथ्र्यापयर्ंत पोहचवून गुणवत्तापूर्ण काम करून घेणेसाठी स्वत: लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील प्रपत्र ब मधील प्रत्येक पात्र व्यक्तीला यामुळे हक्काचे घर प्राप्त होणार आहे. पात्र लाभाथ्र्यांची यादी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. लाभाथ्र्यांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. तसेच घरकुल मंजूर करून देण्यासाठी कुणीही आर्थिक मोबदला मागितल्यास जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधावा. ज्या लाभाथ्र्यांना घरकुलाच्या हप्त्याची रक्कम प्राप्त झाली असेल त्यांनी त्वरित काम सुरु करून आपले घरकुल पूर्णत्वास नेण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील एक हजार घरकुलांना जिओ टॅगिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:31 IST