शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जिल्हाधिकारी राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागल्यानेच गावित परिवाराचे त्यांच्यावर आरोप - चंद्रकांत रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न सुरू केलेेले आहे. विकासासाठी त्यांचे असलेले व्हिजन यामुळे जिल्हाधिकारी ...

नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न सुरू केलेेले आहे. विकासासाठी त्यांचे असलेले व्हिजन यामुळे जिल्हाधिकारी हे खासदार डाॅ. हिना गावित व आमदार डाॅ. विजयकुमार गावित यांना राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागले आहेत. त्यामुळेच ऊठसूट त्यांच्यावर आरोप करून रेमडेसिविरचे राजकारण केेले जात असल्याचा आरोप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, खासदार डाॅ. हिना गावित यांनी किती रेमडेसिविर आणले, कुठे वाटले, कितीची बिले होती याचे पुरावे द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

खासदार डाॅ. हिना गावित यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आरोप केले होते. त्यावर रघुवंशी यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेली कामे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली आहेत. कोविडच्या आधी आकांक्षित जिल्हा विकासासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांचे प्रयत्न चांगले आहेत. आदिवासी समाजाचे अधिकारी असल्याने त्यांना आदिवासींच्या समस्या, प्रश्न माहीत आहेत. त्यांच्या कामाचा धडाका पाहता गावित परिवाराला ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात व जिल्ह्यात राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागले आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांना पाण्यात पाहण्याचे काम गावित पिता-पुत्री करीत असल्याचेही रघुवंशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपण राजकारणात येणार नाही हे एकदा स्पष्ट करून दिले तर गावित परिवाराला शांतता लागेल, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत बोलताना रघुवंशी यांनी सांगितले की, थेट रुग्णालयांना रेमडेसिविर पुरविण्याचा शासनाचा निर्णय झालेला नसताना आपण रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडून एक हजार इंजेक्शन उधारीच्या बोलीवर घेतले. त्यासाठी आरोग्य विभागाची रीतसर मान्यता आहे. त्यासाठी डिपॅाझिटमधून पाच लाख ९४ हजार रुपयांचा चेक जमा केला आहे. १६ एप्रिल रोजी शासनाचा थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरविण्याचा आदेश काढण्यात आला असून, खासदार डाॅ. गावित खोटे बोलून ते रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार डाॅ. गावित व आमदार विजयकुमार गावित यांनी कुठून आणि किती इंजेक्शन आणले, त्यांची बिले कुठे आहेत, किती दवाखान्यांना दिले, कुठल्या पेशंटला दिले याची कागदपत्रे दाखवून दिली तर आपण नंदुरबार सोडून जाऊ, असे आवाहन त्यांनी दिले.

खासदार बनण्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेतली. खासदार झाल्यानंतर कुठले आरोग्य शिबिर घेतले ते दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात व राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप असलेला कुणी नेता व कुठले घराणे असेल तर ते गावित परिवार आहे. त्यांनीच आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करावा हे मोठे दुर्दैव आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाॅक्टरांची कमतरता आहे. असे असताना स्वत: खासदार व त्यांची लहान बहीण एम. डी. डाॅक्टर असताना ते सेवा देऊ शकत नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.