शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांमुळे आरोग्यसेवेत गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या हजेरीबाबत चर्चा सुरु झाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या हजेरीबाबत चर्चा सुरु झाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्रात नियमित हजर करावे मगच बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशी चर्चा सुरु असतानाचा याचा लाभ मात्र परप्रांतातून आलेले बोगस ‘बंगाली’ डॉक्टर घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ प्रमाणपत्र आणि वैद्यकीय पद्धती अर्थात पॅथीची कोणतीही माहिती नसताना घातक अशा ‘स्टेरॉईड’च्या बळावर त्यांचा धंदा जोरात सुरु आहे़जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुमारे ३०० उपकेंद्रांमध्ये १ हजारच्या जवळपास आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत़ असे असतानाही जिल्ह्यातील तीन तालुक्यात बंगाली डॉक्टरांची बोगस उपचार पॅथी वेगात सुरु असल्याचे दरवेळी समोर येत आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्याच्या काही भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील असुविधांमुळे नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाºयांना शहरी भागात नाईलाजाने निवास करावा लागत आहे़ यातून वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याने रात्री-अपरात्री येणारे रुग्ण तपासणी करण्यासाठी डॉक्टर नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुर्गम भागातील आदिवासी बांधव बोगस डॉक्टरांच्या आश्रयाला जातात़ साधारण ५० रुपयात एक इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णास बरे वाटते म्हणून घरी जाण्याचा सल्ला देणाºया या डॉक्टरांच्या या प्रकारांमुळे काहींचा आजार वाढून मृत्यूलाही सामोरे जावे लागले होते़ यानंतरही जिल्ह्यात त्यांचा वावर कायम असून जिल्हा परिषदेनेही यातून धडा न घेता वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांवर खापर फोडत पदे भरण्याची मागणी केली आहे़विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाºयांची दहाच पदे रिक्त असल्याची माहिती आहे़ यातून सुविधा नसल्याने वैद्यकीय अधिकारी निवासी नसल्याचे पुढे येऊन तशी कारवाई होत नसल्याने बोगस डॉक्टरांचे ‘गौडबंगाल’ वाढत आहे़ येत्या काळातही हाच प्रकार सुरु राहण्याची शक्यता असली तरी वैद्यकीय अधिकाºयांना निवासासह वाहनांची सुविधा आणि आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांपर्यंत जाणारे रस्ते दिल्यास सगळ्याच समस्या सुटतील असा विश्वास दुर्गम भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे़