शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

गांधी घराघरार्पयत पोहचावा- कुसुमबेन शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:35 IST

संडे स्पेशल मुलाखत --------------- महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान आणि दिल्लीत गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेअंतर्गत जनप्रबोधन आणि समाज कार्याची विविध कार्य सुरू आहेत. म.गांधी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चरखा सेवेने अनेक महिलांना सक्षम केले आहे.

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबडोदा येथील गंगानाथ विद्यालय हे क्रांतीकारकांचा अड्डा होता. त्याच ठिकाणी आचार्य काकासाहेब कालेलकर यांचेही कार्य सुरू होते. परंतु म.गांधी यांच्या ते संपर्कात आले आणि अहिंसेच्या मार्गावर या आंदोलनात सहभागी झाले. काकासाहेबांसोबत देशभर प्रवास करता आला. काकासाहेबांनीच स्थापन केलेल्या गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेचे काम दिल्ली येथील राजघाटावर आपण 50 वर्षापासून सांभाळत असून त्यातून आपल्या आयुष्याला वेगळीच झळाळी मिळाल्याची भावना या सभेच्या अध्यक्षा कुसुमबेन शहा यांनी व्यक्त केली. प्रश्न : गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेची वाटचाल कशी सुरू आहे?उत्तर : आचार्य काकासाहेब कालेलकर यांनी 1942 मध्ये सुरुवातीला हिंदुस्थानी प्रचार सभा अशी संस्था स्थापन केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या सभेसाठी पंडित नेहरू यांनी राजघाटावर गांधींच्या समाधीच्या परिसरात संस्थेला जागा दिली आणि तेथेच या संस्थेचे काम आजवर सुरू आहे. पुढे हीच संस्था गांधी हिंदुस्थानी साहित्य सभा म्हणून नावारुपास आली. या संस्थेतर्फे कला, साहित्य क्षेत्रातील काम व्यापक स्तरावर सुरू आहे. गांधींनी खेडय़ाकडे चला असे म्हटले होते. त्याच मार्गावर ग्रामिण भागात गांधी विचार पोहचविण्यासाठी प्रय} सुरू आहेत. संस्थेतर्फे विचार प्रसारासाठी 26 जानेवारी 1950 पासून मंगलप्रभात हे मासिकही सुरू आहे. प्रश्न : संस्थेतर्फे सध्या कुठले उपक्रम राबविले जात आहेत? उत्तर : संस्थेच्या दिल्ली कार्यालयात रोज सकाळी सात वाजता गांधी विचार प्रार्थनेपासून दिवसाला सुरुवात होते. ती रात्री नऊ वाजेर्पयत विविध कार्यक्रमांनी सुरू असते. विशेषत: शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण, महिलांना स्वावलंबनासाठी  शिलाई मशीनचे प्रशिक्षण, चरखा सेवा, संगीत वर्ग, निसर्गोपचारबाबत मार्गदर्शन यासह अनेक कार्यक्रम सुरू आहेत. ‘बापूने कहा था’ हे नाटक गावागावार्पयत नेण्यासाठी प्रय} सुरू आहेत. 

नंदुरबारलाही केंद्र सुरूआपण 30 वर्षापूर्वी नंदुरबारात एका विवाह सोहळ्याला आली होती. त्यावेळी या भागातील लोकांशी भेटल्यानंतर येथेही सहयोग लाभल्याने आचार्य काकासाहेब कालेलकर केंद्र सुरू आहे. या ठिकाणीही नित्यनियमाने चरखा सेवा याच्यासह महिलांसाठी, बालकांसाठी विविध उपक्रम सुरू असून ते सामाजिक अंगाने परिणामकारक ठरत आहे. 

चार राज्यात संस्थेचे केंद्रदिल्लीसह राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्र या संस्थेचे केंद्र सुरू आहेत. विशेषत: राजस्थानमध्ये बडगाव (बुंदी) येथे जलसंधारण क्षेत्रातील व्यापक स्वरूपाचे काम उभे झाले आहे. कर्नाटकमध्येही बेळगाव जवळ काकासाहेब शिक्षण निधी नावाने काम सुरू आहे. म.गांधी यांचे विचार गावागावात आणि घराघरार्पयत पोहचविण्यासाठी संस्थेचे प्रय} सुरू असल्याचे कुसूमबेन शहा यांनी सांगितले.