शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

राजरंग- ये राजनितीका खेल है किसी के समझमे नही आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:33 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाचा नवा ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाचा नवा चेहरा समोर आला. अर्थात नंदुरबार जिल्ह्यासाठी हे नवीन नाही. कारण प्रत्येक निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे वेगवेगळी असतात. पक्षाला फारसे महत्त्व नाही. व्यक्तीगत हितसंबंध आणि अंतर्गत वेगवेगळ्या माध्यमातून असलेले संबंध हे त्या त्या वेळी प्रत्येक नेत्याची भूमिका ठरवीत असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी पक्षीय नेत्यांची भूमिका वेगळी असते. विधानसभेच्यावेळी ती काही बदलते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ती अजून वेगळी पहावयास मिळते. हेच चित्र या निवडणुकीतही पहायला मिळाले.अमरिशभाई पटेल यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. म्हणून याठिकाणी पोटनिवडणूक झाली. ज्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळी या निवडणुकीसाठी केवळ २३ महिने शिल्लक होते. त्यामुळे अल्प काळासाठी होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना फारशी चुरस दिसून आली नाही. उमेदवारीसाठी कुणी पुढे येत नाही हे पाहून युवा नेता अभिजित पाटील यांनी आपले भाग्य आजमावण्यासाठी पुढाकार घेतला. अर्थातच या मतदारसंघातील राजकीय चित्र व अमरिशभाई पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्याच्या दोन्ही जिल्ह्यात असलेले राजकीय हितसंबंध पाहता ही निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी वाटत होती. अर्ज भरण्याच्या वेळी अभिजित पाटील यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते होते. त्यामुळे जर का महाविकास आघाडीचे सर्व नेते खरच संपूर्ण शक्तीनिशी एकत्र आले तर अभिजित पाटील हे चुरस देतील की काय? अशीही स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निवडणुकीबाबत काहीशी उत्सुकताही होती. पण लॉकडाऊनमुळे निवडणूक पुढे ढकलली. या आठ महिन्यांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जेव्हा निवडणुकीची स्थगिती उठवून पुढील कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा मात्र या निवडणुकीबाबत फारशी उत्सुकता राहिली नव्हती. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व शिवसेनेचे नेते या तिघांनी संयुक्तपणे जेव्हा पत्र काढून अभिजित पाटील यांच्या विजयाचे आवाहन केले तेव्हा पुन्हा लोकांमध्ये काहीशी उत्सुकता वाढली. पण हे पत्रदेखील केवळ सोशल मिडीयापुरतेच मर्यादित राहिले. महाविकास आघाडीचे नेते कधीही एकत्र येताना दिसले नाहीत. त्यामुळे साहजिकच निकालात कुणाला किती मते पडणार? अमरिशभाई किती मतांनी विजयी होणार? एवढीच उत्सुकता लागून होती.निकालानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी अतिशय सावध आणि सूचक प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, महाविकास आघाडी अर्थात तीन पक्षांच्या आघाडीच्या संसाराची ही सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या तिन्ही पक्षात घनिष्ठ संबंध व समन्वयात काहीशी त्रुटी जरुर आहे. पण पुढील काळात मात्र तिन्ही पक्षांना एकजुटीने एकत्र यावे लागेल. त्यांच्या या प्रतिक्रीयेने आगामी काळात महाविकास आघाडी खरोखरच एकजुटीने एकत्र येईल का? याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल. पण सध्याची जिल्ह्याची राजकीय स्थितीदेखील विरोधाभास निर्माण करणारी आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील २०० मतांपैकी १३० मते महाविकास आघाडीकडे होती तर भाजपकडे मात्र ७० मते होती. पण आतील चित्र पाहता नंदुरबार पालिकेची सत्ता शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे आहे. त्यांचे पालिकेतील सदस्य अद्याप तरी पक्षीय पातळीवर काँग्रेसमध्येच आहेत. तसेच चित्र शहादा पालिकेचेही सांगता येईल. कारण येथे अभिजित पाटील यांचे वडील मोतीलाल पाटील हे नगराध्यक्ष असून ते भाजपकडून विजयी झाले आहेत. तेथे त्यांच्या गटातील नगरसेवक हेदेखील भाजपकडूनच विजयी झाले आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नगरसेवक भाजपचे नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पालिकेत भाजप आणि महाविकास आघाडीचे समीकरण पक्षीय पातळीवर मांडता येणार नाही. असेच चित्र थोड्याफार प्रमाणात इतर ठिकाणीदेखील आहे. जिल्हा परिषदेचे काही सदस्य आघाडीच्या गटातून विजयी झाले असले तरी त्यांचे समर्थन इतर काळात उघडपणे भाजपसोबत आहे. ही स्थिती पाहता पक्षीय समीकरणाची सांगड ठोसपणे मांडणे अवघडच आहे. केवळ या निवडणुकीतच नाही तर आगामी दोन वर्षापर्यंत असेच गुंतागुंतीचे राजकारण जिल्ह्यात पहायला मिळणार आहे. परिणामी पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणालाच जिल्ह्यात महत्त्व आले आहे.