शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील बाजारपेठेत सोशलडिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 22:10 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :   कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाकडून नियम शिथिल करत मिशन बिगिन अगेन ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :   कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाकडून नियम शिथिल करत मिशन बिगिन अगेन अंतर्गत व्यवहार हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून जनतेला या काळात गर्दी न करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, याला विक्रेते व नागरिक गांभीर्याने न घेता खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत व मास्क न वापरून प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. दरम्यान जिल्ह्यात सध्या रोज चाचणीत पॉझीटिव्ह येणाऱ्या रूग्णांमध्ये शहादा तालुक्यातीलच रूग्णांची संख्या जास्त येत असल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे.शहरातील बाजारपेठात नागरिकांनी दिवाळीत व नंतरदेखील खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. मात्र अनेकजण तर विनामास्क बाजारपेठेत फिरतानाही दिसत आहेत. त्यामुळे विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोनाला नागरिक खुले आमंत्रण तर देत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांची ही बेफिकीरी पुन्हा कोरोनाला आमंत्रण देत आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते. आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल. पाश्चिमात्य देशांप्रमाणे आपल्या येथेही पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येऊ नये यासाठी नागरिकांनी स्वत: आपली जबाबदारी ओळखून काळजी घेणं आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.ऑक्टोंबर महिन्यात लुळा पडलेला कोरोना विषाणू पुन्हा डोकेवर काढत आहे का असे मागील चार दिवसात शहादा तालुक्यातील ७१ रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर वाटू लागले आहे. आजअखेर एकूण दोन हजार १९१ रूग्ण बाधीत झाले असून, त्यातील दोन हजार ५३ रूग्ण बरे झाले आहेत. ८६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात रूग्णांची वाढलेली संख्या बघता शहादेकरांसाठी हा चिंतेच्या विषय ठरू शकतो. यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.'जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही' असं वारंवार सांगूनदेखील नागरिकांमध्ये काहीच फरक दिसून येत नाही. जसं काय कोरोना हा गेलाच अशी परिस्थिती बाजारपेठत आता निर्माण झाली आहे. सध्यातरी कोरोनावर एकमेव औषध म्हणजे काळजी घेणे हेच आहे. तरीदेखील बाजारपेठेत फेरफटका मारताना दिसून येतो की अनेकजन कोरोनाबद्दल काळजी घेताना दिसून येत नाही. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. हे नागरिक विसरले आहेत.शहादा शहरात मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. तसेच शहरातील विविध भागात ठेला गाडीवर मोठ्या प्रमाणावर विक्रेते फळ व भाजीपाला विकतात. मात्र हे विकताना त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची अंबलबजावणी करणे आवश्यक असताना ते कोरोना संदर्भात असलेली कोणतीच काळजी घेताना दिसत नसून विक्री करताना तोंडाला मास्क देखील लावलेले नाही. याबाबत काही विक्रेत्यांना हटकले असता. त्यांनी आता कोरोना गेला, संपलेला आहे, आता काही होत नाही असा समज त्यांच्यात असून ते बिनधास्तपणे कोणालाही न जुमानता शासनाच्या नियमांची पायमल्ली करत फळे व भाजीपाल्याची विक्री करताना दिसून येत आहेत. फळे - भाजीपाला ही रोज आणि नियमित लागणारी गरज आहे त्यामुळे विक्रेत्याकडे लोकांचे येणे जाणे चालू असते. अश्यामुळे कोरोनाचे संक्रमांचे देवाण घेवाण चालू होऊ शकते व संसर्गाचा धोका वाढू शकतो. नियम न पाळत कोरोनाचा फैलाव करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणाऱ्यां व्यावसायिकांच्या संबंधितांनी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी ज्या विक्रेत्याने मास्क लावला नसेल त्यांच्याकडे वस्तू खरेदी न करण्याच्या निर्णय घेतल्यास फायद्याचे ठरू शकेल.