शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार व शहादा उपविभागांना १९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

तळोदा : जिल्हा विकास नियोजन समितीकडून वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार व शहादा उपविभागांना पावणे १९ कोटी रुपयांचा निधी तीन ...

तळोदा : जिल्हा विकास नियोजन समितीकडून वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार व शहादा उपविभागांना पावणे १९ कोटी रुपयांचा निधी तीन दिवसांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसा धनादेशदेखील प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून पुढील प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नंदुरबार व शहादा उपविभागांतील कामांसाठी या यंत्रणांनी साधारण १८ कोटी ६९ लाख रुपयांच्या निधीचा आराखडा यंदा जिल्हा विकास नियोजन समिती अर्थात डीपीडीसीकडे दाखल केला होता. फेब्रुवारी महिन्यातच जिल्हा नियोजन समितीने सदर आराखड्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती; परंतु चार महिने होऊनही प्रत्यक्षात प्रशासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नव्हता. साहजिकच वीज वितरण कंपनीच्या या दोन्ही विभागांना कामे हाती घेताना पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. निधी उपलब्ध करून देण्याबाबत यंत्रणांनी पाठपुरावाही केला होता. मात्र कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे अगदी पावसाळा तोंडावर येऊनदेखील वीज वितरण कंपनीकडून हालचाली सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त करून हा प्रश्न ‘लोकमत’मध्ये उपस्थित केला होता. याबाबत गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ने वस्तुनिष्ठ वृत्त दिले होते. त्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन दोन दिवसांनंतर वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार येथील भांडार विभागाकडे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेला संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसा आशयाचा धनादेशदेखील प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आता आराखड्यात नंदुरबार व शहादा उपविभागांनी ज्या वस्तूची तरतूद केली आहे, त्यांची पुढील टेंडरिंग प्रक्रिया पार पाडण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; कारण या दोन्ही यंत्रणांनी जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांतील ११४ आदिवासी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या नवीन वीज कनेक्शनची कामे घेतली आहे. याशिवाय ७० रोहित्रेदेखील घेतली आहे. त्याचबरोबर धोकादायक उच्च व कमी दाबाच्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी तारा, वीज खांबांची तरतूद केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रासाला तोंड द्यावे लागतेच. मात्र आता पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे वादळ, वाऱ्यामुळे तारा तुटण्याच्या धोका वाढलेला आहे. नुकत्याच झालेल्या वादळामुळे गेल्या रविवारी शेळ्या चरणाऱ्या लहान मुलींचा शेतात तुटलेल्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. शिवाय शेळ्यादेखील दगावल्या होत्या. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या संबंधित यंत्रणांनी या कामांना प्राधान्य देऊन ते तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आहे.

कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत

वीज वितरण कंपनीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देताना या दोन्ही यंत्रणांनी गाव, वाड्या, पाड्यांमधील कामांना प्राधान्य द्यावे. तसेच ही कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. त्याचबरोबर कामांचा तांत्रिक दर्जा राखून लेखापरीक्षण, गैरव्यवहार झाल्यास संबंधित अधीक्षक अभियंत्यास जबाबदार धरले जाईल. आराखड्यात ज्या गावात साहित्याची तरतूद केली आहे. येथेच कामे घेण्यात यावीत. दुसऱ्या ठिकाणी बदल करू नये, असे निदर्शनास अथवा तक्रार दखल झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशा वेगवेगळ्या सूचनादेखील संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा विकास नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या १८ कोटी ६९ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, तसा चेकदेखील प्राप्त झाला आहे.

- बी. आर. चौधरी, जनरल मॅनेजर, वीज वितरण कंपनी कार्यालय, नंदुरबार.