शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

नंदुरबार शहरात सकाळी सात वाजेपासून विविध ठिकाणी मिळणारे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते. कचोरीपासून ते मूगभजीपर्यंत तसेच गुजराती फाफडा ...

नंदुरबार शहरात सकाळी सात वाजेपासून विविध ठिकाणी मिळणारे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते. कचोरीपासून ते मूगभजीपर्यंत तसेच गुजराती फाफडा ते जिलेबीपर्यंत सर्वच पदार्थांना मोठी पसंती दिली जाते. परंतु बहुतांश ठिकाणी सकाळी कढईत टाकलेल्या तेलातच दुपारपर्यंत पदार्थ तळून घेण्याची पद्धत अवलंबली जाते.

रस्त्यावर न खाल्लेले बरे

नंदुरबार शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर तेलात तळले जाणारे पदार्थ सहज उपलब्ध होतात.

कचोरी, समोसे, पाववडा, बटाटेवडा, फाफडा, भजी हे पदार्थ खाण्यास सर्वाधिक पसंती दिली जाते.

हातगाड्यांवर तेलाचा वारंवार वापर होत असताना कढईच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते.

एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर पोटाच्या विकारांना सुरुवात होते. यात पित्ताचा सर्वाधिक त्रास होतो. तसेच हृदयासंबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते. घशात खवखव होण्याचे प्रमाणही वाढते. बहुतांश हाॅटेल व्यावसायिकांकडे तेलाचा वापर झाल्यानंतर ते उघड्यावर ठेवण्यात येऊन त्यात पुन्हा तळण काढले जाते.

पुनर्वापर केलेल्या तेलाचे सेवन करणे म्हणजे आजारांना आमंत्रण देणे आहे. अशा तेलामुळे हृदयरोग बळावण्याची चिन्हे असतात. शरीरिक क्षमता कमकुवत करण्याचे काम तेलकट पदार्थ करतात. सामान्यपणे नागरिकांनी तेलकट पदार्थ टाळावेत.

- डाॅ. राजेश वळवी, तज्ज्ञ

कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे अन्नघटकांना महत्त्व आले आहे. नागरिकांनी योग्य त्या प्रथिनांसह कार्बोदके वाढविणारे पदार्थ अन्नात घेतले पाहिजेत. जंकफूड किंवा तेलकट पदार्थ हे आरोग्य हानिकारक आहेत. तेलाच्या वारंवार वापरातील पदार्थ धोक्याचेच.

- तृप्ती नाईक, आहार तज्ज्ञ

तीन वर्षांपूर्वी नागरिकांच्या आग्रहाखातर अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नंदुरबार येथे सुरू करण्यात आले. या ठिकाणी धुळ्याहून दोघे अधिकारी नियुक्त केले गेले. परंतु गेल्या दीड वर्षात हे अधिकारी दिसून येत नाहीत. अन्न पदार्थांबाबत अनेक तक्रारी असल्या तरी कारवाई होत नाही. धुळे येथील सहायक आयुक्तही येथे दाैरे करीत लक्ष घालत नसल्याने जिल्ह्यात मनमानी पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री सुरू आहे.

नंदुरबार शहरासह जिल्ह्यात रस्त्यावरच्या हातगाड्या आणि काही हाॅटेल्समध्ये तेलाचा सर्रासपणे पुनर्वापर केला जातो. यातून एकावरही कारवाई झालेली नाही.

आजवर तेलाचा पुनर्वापर केल्यावर कारवाईच होत नसल्याने सर्वच ठिकाणी तेलाचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जातो.