शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अंत्योदय व प्राधान्य कुटूंबाला मे महिन्यात मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे वितरण वेळेवर करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. मार्च ...

कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे वितरण वेळेवर करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील १०६३ रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ९३ हजार ९८० कुटुंबांना ९४३ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), १३ हजार १५४ क्विंटल भरडधान्य, १८ हजार ७९६ क्विंटल तांदूळ आणि ९४० क्विंटल साखरेचे वितरण करण्यात आले.

याच कालावधीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत एक लाख ३८ हजार ८८३ कुटुंबांना ७४९ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), ११ हजार २८३ क्विंटल भरडधान्य आणि १८ हजार २१० क्विंटल तांदळाचे वितरण करण्यात आले. विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर अन्नधान्य मिळत असल्याने संकटाच्या काळातही कुटुंबातील सदस्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे.

एप्रिल महिन्यातही नेहमीच्या अल्प दरानुसार अन्नधान्य वितरण होणार असून मे महिन्यातील अन्नधान्य मोफत मिळणार आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानदाराला कोणतेही शुल्क न देता आपले मे महिन्यातील अन्नधान्य घेता येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.