शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

चार टक्के पीक कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे़ जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे़ जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच असल्याने सर्व बँकांनी मिळून केवळ ३़६० टक्के कर्जाचे वाटप केल्याचे समोर आले आहे़ महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत़जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगाम २०२०-२१ साठी १०० टक्के कर्जवाटप करण्याचे निर्धारित केले आहे़ यांतर्गत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६० कोटी ७५ लाख, जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकांना ४५७ कोटी ३० लाख, ग्रामीण बँकेला १३ कोटी ३१ लाख तर खाजगी बँकांनी किमान ८४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ सप्टेंबर अखेरपर्यंत होणाºया या कर्जवाटपाचा जिल्हा प्रशासन वेळोवेळी आढावा घेऊन माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ दरम्यान एप्रिलपासून सुरु झालेल्या कर्जवाटपात केवळ जिल्हा बँकेने आघाडी घेतली असून त्यांनी आतापर्यंत त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या ३१ टक्के कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे़ जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात २९ शाखा आहेत़ यात ३०७ विविध कार्याकारी संस्था आणि १७ हजाराच्या जवळपास स्वतंत्र खातेदारांचा समावेश आहे़ जिल्हा बँकेतून कर्ज घेणारे ६० टक्के खातेदार हे केवळ तीन ते सहा महिन्याच्या आत कर्जाचा परतावा करत असल्याने बँकेची स्थिती समाधानकारक आहे़सहकारी बँकेची स्थिती चांगली असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ १ टक्का कर्ज वाटप केले आहे़ गेल्या काही दिवसात कर्जवाटपात येणाºया अडथळे दूर करण्यासाठी शासनाकडून आदेश देण्यात येऊन अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश आहेत़ यांतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना २०१९ या योजनेत पात्र २७ हजारापेक्षा अधिक शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचे दिसून आले होते़ यातून शासनाकडून कर्जवाटप सुरळित होऊन ग्राम, तालुका आणि जिल्हा स्तरावर शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांतर्गत पालक अधिकारी नियुक्त केले आहेत़ हे अधिकारी नवीन सभासदांना क व म पत्रक मंजूर करणे, नियमित कर्जदारांना कर्जवाटप करणे, कर्जमाफी योजनेचा आढावा घेणे, नवीन सभासद, बिगर कर्जदार व थकबाकीदारांना कर्जवाटप करणे, ५० पैश्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील शेतकºयांना पुर्नगठनासाठी संमती पत्राचा आढावा घेणे, किसान के्रडीट कार्ड यासह विविध बाबींचा आढावा घेणार आहेत़ सहा तालुक्यात जिल्हा उपनिबंधकांनी ३० अधिकारी यासाठी नियुक्त केले असल्याची माहिती आहे़

जिल्ह्यातील सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक आणि खाजगी बँकांनी मिळून ६१५ कोटी ९८ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे़ तब्बल ७२ हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांना प्रशासनाने कर्जपुरवठा होईल याकडे लक्ष देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत़ परंतू प्रत्यक्षात मात्र कर्जवाटपाबाबत गेल्यावर्षी असलेली उदासिनता यंदाही दिसून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांकडून कर्जमाफी योजनेंतर्गत नीलचा दाखला आणि तलाठींकडून बोजा उतरवण्याचा सातबारा यांची मागणी करुन इतर कागदपत्रे वाढवून फिरवाफिरव करत आहेत़ तूर्तास कोरोनामुळे शेतकºयांना बँकांमध्ये येण्यास अडचणी येत असल्याने कर्जवाटप करण्याबाबत सोयीस्कर मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़

४जिल्हा बँकेच्या २९ शाखांमधून आतापर्यंत विविध कार्यकारी संस्था आणि थेट कर्जदार यांना रुपे कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत आहे़ सोमवार अखेरीस बँकेने २ हजार ३९१ कर्जदारांना २३ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ यात विविध कार्यकारी संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे़ बँकेने दोन महिन्याच्या काळातच ३९ टक्के कर्जवाटप केले आहे़ शेतकऱ्यांना बॅकेत येऊन अडचणी येऊ नये यासाठी सर्वांना रुपे कार्ड दिल्याने शेतकरी एटीएममधून पैसे काढत आहेत़४राष्ट्रीयकृत बँकांना मोठे उद्दीष्ट्य असताना आतापर्यंत ११ राष्ट्रीयकृत बँकांनी मिळून केवळ २३१ शेतकऱ्यांना ३६ लाख ९० हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे़ केवळ एक टक्के कर्ज वाटप त्यांनी केले आहे़४ग्रामीण बँकेने ३१ शेतकºयांना ३१ लाख तर खाजगी बँकांनी २२ शेतकºयांना ३४ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़